शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

उद्योगांमध्ये सांघिक भावना वाढीस लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:06 IST

औरंगाबाद : नफा- तोट्याचे गणित न मांडता उद्योग टिकला, तर आपले भवितव्य टिकेल, या भावनेतून मालकांपासून कामगारांपर्यंत सर्वजण ...

औरंगाबाद : नफा- तोट्याचे गणित न मांडता उद्योग टिकला, तर आपले भवितव्य टिकेल, या भावनेतून मालकांपासून कामगारांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहेत. ही माझी जबाबदारी नाही, अशी मानसिकता न बाळगता उद्योगाच्या वाढीसाठी सांघिक भावनेतून काम करत आहेत, हा सर्वात मोठा बदल कोरोनामुळे आला, असे मत ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमन अजगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मागील वर्षी कोरोनाची मोठी लाट आली आणि संपूर्ण जग ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे उद्योग, बाजारपेठा, दळणवळण थांबले. यातून कधी मार्ग निघेल, याबद्दल सारेच साशंक होते; मात्र धीर न सोडता सर्वजण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. ‘उद्योग रडत बसले नाहीत, ते लढत राहिले.’ या संकटातून आपणास बाहेर निघायचे आहे. या संकटावर मात करून पुढे जायचे आहे, याबद्दल उद्योगात काम करणारे सर्वच घटक सांघिक निर्णय घ्यायला लागले. उद्योगातील सर्वच घटकांमध्ये प्रगल्भता आली. पूर्वी स्वत:च्या उद्योगाऐवजी दुसऱ्याने बदल केला, तर माझा फायदा होईल, अशी भावना छोट्या-मोठ्या उद्योगांची होती. आता उद्योग, व्यवसाय वाढीसाठी लोकांनी स्वत:मध्ये बदल करून घेण्यास सुरुवात केली. येणाऱ्या काही दिवसांत त्याचा सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येईल. आता संकट कोणतेही आले, तरी त्यातून आपणास मार्ग काढावा लागणार, ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक भावना वाढीस लागली.

उद्योगात आरोग्याची काळजी घेण्याबाबत जागरुकता सर्वांमध्ये आली. आपण मास्क लावला पाहिजे, नियमित हात स्वच्छ धुतले पाहिजेत. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. गर्दी न करता अंतर राखून काम केले पाहिजे, असे आता प्रत्येकाला वाटते.

‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, कोरोनाने तथ्य स्वीकारायला शिकवले. उद्योगात बदल करण्याचे धाडसही कोरोनाने शिकवले. दुसरीकडे उद्योगांमध्ये आता हा विचार सुरू झाला आहे की, भविष्यात कोरोनासारखे संकट आले, तर त्यावर किमान दोन-तीन वर्षे तग धरण्यासाठी स्वत:मध्ये बदल करून घेण्याची तयारी सुरू केली आहे. आयटी इंडस्ट्रीच नव्हे, तर मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमध्येसुद्धा ‘वर्क फ्राॅम होम’ ही कार्यप्रणाली रुढ होत आहे.