शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मुख्य अभियंत्याच्या चौकशीसाठी पथक

By admin | Updated: February 14, 2015 00:13 IST

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले होते. त्याप्रमाणे शिंदे यांच्या कार्यकाळातील कारभाराची मुंबईहून औरंगाबादेत दाखल झालेल्या तीन सदस्यीय समितीने चौकशी चालू केली आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात परिमंडलामध्ये अनेक कामे करण्यात आली. त्या कामांची आणि कामात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी या मागणीविषयी राज्याचे अवर सचिव एस. एस. शिरसीकर यांना पत्राद्वारे कळविले होते. सचिवांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी समितीतील सदस्यांनी शुक्रवारी तक्रार केलेल्या नागरिकांचा जबाब नोंदविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी मे २०१३ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणीसाठी फेज-१ योजनेत अनेक कामे नियमबाह्य केल्याच्या तक्रारी आहेत, शहरात भूमिगत वायरिंगसाठी ड्रम प्रोजेक्ट राबविण्यात आला; पण तो यशस्वी झाला नाही. त्यात अफरातफर केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. जीटीएल आणि महावितरणमधील हस्तांतरण प्रक्रिया पारदर्शक झाली नाही आणि इतर लहान-मोठी कंत्राटे नियमबाह्य दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.