शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

प्राप्तीकर विभागाच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना ठेवले दूर!

By admin | Updated: April 1, 2016 00:57 IST

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले.

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले. पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असली तर कारवाईतील तपशील कळू शकला नाही. तर दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांना या करवाईपासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील शेतकरी, डॉक्टर व इतर अशा सुमारे ६ हजार जणांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. तर तीन ते चार वर्षांपूर्वी पर्यंतच्या काही जुन्या प्रकरणांमध्येही व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्याने घबराटीचे वातावरण पसरले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून करदात्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या चार वर्षांपासून जालना जिल्ह्यात दुष्काळामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर दुसरीकडे प्राप्तीकरण विभागाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी जालना शहरात गेल्या पंधरा दिवसांत सहा ते सात प्रतिष्ठाणांवर प्राप्तीकरण विभागाच्या पथकाने छापे टाकले. पुणे आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. या सर्व प्रक्रियेत स्थानिक अधिकाऱ्यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. कारण दोन्ही छाप्यांच्या वेळी जालनाचे प्राप्तीकर अधिकारी मोईओद्दिन गौस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईबाबत आपण अनभिज्ञ असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ छापे टाकण्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. छापे टाकण्यात आल्यानंतर पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. मात्र, आकड्यांची पडताळणी केली नसल्याचे समजते. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना यापासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अन्यथा तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापे टाकले होते. तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. यंदा ती घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली गेल्यानेच त्यांना या छाप्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.