शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

प्राप्तीकर विभागाच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना ठेवले दूर!

By admin | Updated: April 1, 2016 00:57 IST

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले.

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले. पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असली तर कारवाईतील तपशील कळू शकला नाही. तर दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांना या करवाईपासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील शेतकरी, डॉक्टर व इतर अशा सुमारे ६ हजार जणांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. तर तीन ते चार वर्षांपूर्वी पर्यंतच्या काही जुन्या प्रकरणांमध्येही व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्याने घबराटीचे वातावरण पसरले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून करदात्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या चार वर्षांपासून जालना जिल्ह्यात दुष्काळामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर दुसरीकडे प्राप्तीकरण विभागाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी जालना शहरात गेल्या पंधरा दिवसांत सहा ते सात प्रतिष्ठाणांवर प्राप्तीकरण विभागाच्या पथकाने छापे टाकले. पुणे आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. या सर्व प्रक्रियेत स्थानिक अधिकाऱ्यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. कारण दोन्ही छाप्यांच्या वेळी जालनाचे प्राप्तीकर अधिकारी मोईओद्दिन गौस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईबाबत आपण अनभिज्ञ असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ छापे टाकण्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. छापे टाकण्यात आल्यानंतर पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. मात्र, आकड्यांची पडताळणी केली नसल्याचे समजते. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना यापासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अन्यथा तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापे टाकले होते. तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. यंदा ती घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली गेल्यानेच त्यांना या छाप्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.