शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शिक्षकांच्या आपसी बदल्या सहा दिवसांत

By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST

जालना : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांना शासनाकडून कोणतीही अडचण नसताना गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्हा

जालना : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांना शासनाकडून कोणतीही अडचण नसताना गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या घोळाबाबत ‘लोकमत’ ने २६ मे रोजीच्या अंकातून लक्ष वेधल्यानंतर मंगळवारच्या स्थायी समिती सभेत जिल्हा परिषद प्रशासन नरमले. १ जून २०१५ पूर्वी २०११-१२ तसेच २०१४-१५ या वर्षातील पात्र शिक्षकांच्या आपसी बदल्या करण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी ३ वाजता जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेस प्रारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती ए.जे. बोराडे, शहाजी राक्षे, लिलाबाई लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी गटनेते सतीश टोपे यांनी सुरुवातीलाच शिक्षकांच्या आपसी बदल्यांबाबत ‘लोकमत’ ने प्रकाशित केलेल्या वृत्ताकडे लक्ष वेधले. शिक्षकांच्या आपसी बदल्या करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर शिक्षण सभापती ए.जे. बोराडे यांनी आपण याच मुद्यावरून प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगून ही बदली प्रक्रिया १ जूनपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी १८ मे रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांच्या आपसी बदल्या करता येणार आहेत, असे सांगून २०११-१२ मध्ये ज्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, त्यातील पात्र शिक्षकांच्याही आपसी बदल्या करण्यात येणार आहेत, असे सांगितले. २०१४-१५ मधील पात्र शिक्षकांच्याही आपसी बदल्या करण्यात येणार असून यामध्ये शिक्षक, केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक यांचा समावेश असल्याचे नमूद केले. त्यामुळे सुमारे ४०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.परतूर व मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी, कोकाटे हदगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याचा मुद्दा मांडून आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याची मागणी राहुल लोणीकर यांनी केली. त्यावर सभापती बोराडे यांनी याविषयी आपण पालकमंत्री बबनराव लोणीकर व आ. अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव प्रशासनाकडून गेला नाही, याकडे लोणीकर यांनी लक्ष वेधले. संभाजी उबाळे यांनीही यावेळी काही मुद्दे उपस्थित केले. रामेश्वर सोनवणे यांनी ज्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यात आलेला नाही, तेथे गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी सूचना केली. यावेळी सदस्यांनी विविध विषयांवरून प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)मागील सभा तहकूब झाल्याने ही तहकूब सभा आज घेण्यात आली. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास सभागृहात अंतिम मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कृषी विभागातर्फे मांडण्यात आलेल्या ४० लाखांच्या कडबा कुटी व ५० लाख रुपयांच्या फवारे खरेदीचा विषय फेटाळण्यात आला. ४जि.प. सदस्यांचा स्वेच्छानिधी म्हणून गाळ काढण्यासाठी प्रत्येक गटातून २ लाख याप्रमाणे १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीबाबतही सदस्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा स्वेच्छानिधी एकूण सात लाखांचा आहे. त्यापैकी २ लाख रुपये गाळ काढण्याच्या कार्यक्रमास देण्यात येणार होते.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यात ज्या गावांमध्ये साथरोग उदभ्वतात तेथे आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पावसाळा संपत आल्यानंतर होते. त्यामुळे यावर्षी ही कार्यवाही पावसाळ्यापुर्वी व्हावी, अशी मागणी लोणीकर यांनी केली. जिल्ह्यात ८० टक्के फॉगींग मशीन बंद आहेत. ब्लिचिंग पावडर नाही, या बाबीही त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.