शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:41 IST

आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून बदलीपात्र शिक्षकांची प्रतिक्षा वाढली आहे़ यावर्षीचे अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले असले तरी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़राज्य शासनाने यावर्षी आॅनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया पार पडण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला आहे़ काही जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या तरी नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत़ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी आॅनलाईन बदल्यांचे आदेश मिळण्याची प्रतिक्षा करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील २१५ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ठ आहेत़ २० जूननंतरच शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती़ परंतु त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणीमुळे बदल्यांची प्रक्रिया मंदावली होती़ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या ७ हजार ७५८ असून पदवीधर शिक्षकांची संख्या साडेसातशे आहे़ मुख्याध्यापकांची संख्या ५४३ आहे़ प्राथमिक शिक्षकांच्या सवंर्ग १, २ व ३ याप्रमाणे बदल्या होणार आहेत़ त्यामध्ये पती- पत्नी एकत्रिकरण, आजारी, सर्वसाधारण या प्रमाणे सर्व बदलीपात्र शिक्षकांची माहिती पोर्टलद्वारे शासनास आॅनलाईन पाठविण्यात आली आहे़ विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ मध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, ºहदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक, कर्करोगाने आजारी, आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवारांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला व वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी़ विशेष संवर्ग २ मध्ये पती, पत्नी एकत्रिकरण व १० वर्ष पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र राहणार आहेत़दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ या याचिकांच्या व शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्यातच मागील काही महिन्यापासून शिक्षकांचा वेळ गेला आहे़ त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या काही शिक्षकांची मानसिकता शैक्षणिक वातावरणात रमण्यास तयार नाही़ याचा परिणाम संबंधित शाळेवर होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा प्रश्न निर्माण झाला आहे़