शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षकमित्र’ उपक्रम

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन

कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीचे ज्ञान आत्मसात व्हावे, त्यांना या विषयाची भीती वाटू नये, शिक्षकांनाही हा विषय सुलभतेने शिकविता यावा, यासाठी हा शिक्षकमित्राचा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांना जिल्हास्तरावर २८ आॅगस्ट रोजी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बीट स्तरावर पहिली ते पाचवीचे ३ फुल व सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. शिक्षकांची बैठक व्यवस्था होईल अशाच शाळेवर हे बीट स्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात गणित व इंग्रजी विषयातील त्या-त्या महिन्याच्या वार्षिक नियोजनानुसार येणारे आशयातील कठीण संबोध संकल्पना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या व सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कळमनुरीसाठी विस्तार अधिकारी एस. बी. सोनुने, डोंगरकड्यासाठी एन. बी. बळवंते, वडकुते, नरवाडे यांची नांदापूर बीटसाठी गंगावणे, डवरे यांची तर शेवाळ्यासाठी पी. जी. भोसले, एम. डी. नरवाडे, बालाजी गोरे यांची निवड करण्यात आली आहे. कन्या कळमनुरीचे प्रशिक्षण प्रशाला कळमनुरी डोंगरकडा बीटचे प्रशाला डोंगरकडा, नांदापूर बीटचे कें. प्रा. शा. नांदापूर शेवाळा बीटचे प्रशाला आखाडा बाळापूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी भेटी देऊन वेळोवेळी पाहणी करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच ग्रामीण भागात चांगले शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. दहावीच्या निकालामध्येही अनेक शाळा मागे पडल्याचे दिसून आले. अशा स्थितीत शिक्षण विभागाच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राबविण्यात येत असलेल्या ‘शिक्षकमित्र’ उपक्रमामुळे निश्चित ही स्थिती बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)