शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

जागा रिक्त असतानाही शिक्षक ठरविले अतिरिक्त !

By admin | Updated: August 25, 2014 01:36 IST

कळंब : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करत असताना केवळ प्राथमिक शाळांवरील जागांचाच विचार करण्यात आल्यामुळे जागा रिक्त असतानाही

कळंब : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करत असताना केवळ प्राथमिक शाळांवरील जागांचाच विचार करण्यात आल्यामुळे जागा रिक्त असतानाही १६ शिक्षकांना बाहेरच्या तालुक्यात जावे लागणार आहे. या प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.शाळांना सुरूवात होऊन प्रवेश निश्चिती झाल्यानंतर प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक पदनिर्धारण प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येते. कळंब तालुक्यात ३० सप्टेंबरच्या पद निर्धारणानुसार ५८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. सदरील शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्यासाठी २१ आॅगस्ट रोजी कळंब येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी सदरील कार्यालयाने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील रिक्त पदांचा गोषवारा समायोजनासाठी आलेल्या शिक्षकांसमोर ठेवणे आवश्यक होते. परंतु, घडले याच्या उलट. शिक्षकांसमोर केवळ प्राथमिक शाळांतील रिक्त पदांचा गोषवारा ठेवण्यात आला. तालुक्यातील ईटकूर, खामसवाडी, दहीफळ, मस्सा खंडेश्वरी या शाळांवरील प्रत्येकी दोन शिवाय करंजकल्ला, पिंपळगाव (डों), दाभा, आढळा, लोहटा (प.), वाघोली, नागझरवाडी, सात्रा, वडगाव (सि.), वडगाव (ज) व बाभळगाव या आठ ठिकाणी आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळांवर नवीन शिक्षक नेमणे आवश्यक आहे. असे असतानाही समायोजन प्रक्रियेवेळी प्राथमिक शाळांतील ३९ पदे दाखविण्यात आली. माध्यमिक शाळा, नवीन आठवीचे वर्ग इतर ठिकाणची १९ जागा प्रक्रियेदरम्यान दाखविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एकूण ५८ जागा रिक्त असताना केवळ प्राथमिक शाळेच्या ३९ जागांवरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परिणामी १६ शिक्षक तालुक्यामध्ये जागा उपलब्ध असतानाही बाहेरच्या तालुक्यात जात आहेत. त्यामुळे या गुरूजींवर एकप्रकारे अन्याय झाला असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. याबाबतीत तोडगा काढून शिक्षकांवरील होणारा अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी करून सदरील प्रक्रियेला संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य चिटणीस भक्तराज दिवाणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, चिटणीस राजेंद्र बिक्कड, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार आदींनी विरोध दर्शविला आहे. (वार्ताहर)प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह तालुक्यामध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही, प्रक्रियेवेळी त्या दाखविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तालुकाभरातील १६ गुरूजींना बाहेरच्या तालुक्यात जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे गटशिक्षण अधिकारी कार्यालयाने कोणत्या आधार अशा स्वरूपाचे निकष लावले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच या प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे.