शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

शाळा, महाविद्यालयांत ‘वेद’ शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:07 IST

वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्देसत्यपाल सिंह : अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्घाटन; शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, वाराणसी येथील पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडे, स्वागताध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, तसेच विरुपाक्ष जड्डीपाल, डॉ. रवींद्र मुळे, संमेलन समितीचे अध्यक्ष अनिल भालेराव, संयोजक दुर्गादास मुळे आदींची उपस्थिती होती. डॉ. सिंह म्हणाले की, जसे सूर्य, वेदात विज्ञान दडले आहे. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ‘वेद’ शिकविले, तर समाजातील अपराध कमी होतील. जड्डीपाल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर भालेराव यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन मंजूषा कुलकर्णी व पार्थ बाविस्कर यांनी केले. सुनील सुतावणे यांनी आभार मानले.शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी सांगितले की, नुसते वेद मुखोद्गत करून चालणार नाही. त्यानुसार दैनंदिन जीवनात आपले आचरण करा. वेद मुखोद्गत करणे हे काही सोपे काम नव्हे. सर्वांनाच चार वेद मुखोद्गत करणे शक्य नाही. त्याकरिता कोणी वेद मुखोद्गत करावेत, कोणी वेदाचा अर्थ जाणून घ्यावा, असे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार सर्वांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.दरवर्षी ११ वैदिकांना पुरस्कार देण्याची घोषणाडॉ. सिंह यांनी अखिल भारतीय वैदिक संमेलनात घोषणा केली की, केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी ११ वैदिकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ३५ वर्षांखालील वैदिकांना ५ पुरस्कार तेही प्रत्येकी १ लाख रुपयांचे देण्यात येणार आहेत. यातून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या वेद मुखोद्गत करणाºयांची प्रतिष्ठा वाढविणे व ‘वेद’ आत्मसात करण्याची लोकांना प्रेरणा मिळावी, असा उद्देश आहे.