शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

शाळा, महाविद्यालयांत ‘वेद’ शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:07 IST

वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्देसत्यपाल सिंह : अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्घाटन; शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, वाराणसी येथील पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडे, स्वागताध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, तसेच विरुपाक्ष जड्डीपाल, डॉ. रवींद्र मुळे, संमेलन समितीचे अध्यक्ष अनिल भालेराव, संयोजक दुर्गादास मुळे आदींची उपस्थिती होती. डॉ. सिंह म्हणाले की, जसे सूर्य, वेदात विज्ञान दडले आहे. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ‘वेद’ शिकविले, तर समाजातील अपराध कमी होतील. जड्डीपाल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर भालेराव यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन मंजूषा कुलकर्णी व पार्थ बाविस्कर यांनी केले. सुनील सुतावणे यांनी आभार मानले.शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी सांगितले की, नुसते वेद मुखोद्गत करून चालणार नाही. त्यानुसार दैनंदिन जीवनात आपले आचरण करा. वेद मुखोद्गत करणे हे काही सोपे काम नव्हे. सर्वांनाच चार वेद मुखोद्गत करणे शक्य नाही. त्याकरिता कोणी वेद मुखोद्गत करावेत, कोणी वेदाचा अर्थ जाणून घ्यावा, असे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार सर्वांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.दरवर्षी ११ वैदिकांना पुरस्कार देण्याची घोषणाडॉ. सिंह यांनी अखिल भारतीय वैदिक संमेलनात घोषणा केली की, केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी ११ वैदिकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ३५ वर्षांखालील वैदिकांना ५ पुरस्कार तेही प्रत्येकी १ लाख रुपयांचे देण्यात येणार आहेत. यातून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या वेद मुखोद्गत करणाºयांची प्रतिष्ठा वाढविणे व ‘वेद’ आत्मसात करण्याची लोकांना प्रेरणा मिळावी, असा उद्देश आहे.