शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

सरकारला धडा शिकवा : मांतग आरक्षण परिषदेत ठराव

By admin | Updated: September 13, 2014 23:52 IST

नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा,

नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन मातंग आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विभागीय बैठकीत मातंग समाजातील नेत्यांनी केले़ ताज पाटील हॉटेल येथे शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीस मानवी हक्क अभियानचे अ‍ॅड़ एकनाथ आव्हाड, दलित महासंघाचे प्रा़ मच्छिंद्र सकटे, माजी आ़ अविनाश घाटे, अ‍ॅड़ दयानंद भांगे, डॉ़ माधव गादेकर, प्रा़ जी़ एस़ वाघमारे, दिलीप आगळे, मारोती वाडेकर, संभाजी मंडगीकर, अ‍ॅड़ रानवळकर, लालबाजी घाटे, शिवा कांबळे, गणेश तादलापूरकर, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती़ सरकारने मातंग समाजावर अन्याय केला़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने संघटित होऊन मताचा उपयोग शस्त्र म्हणून करावा, असे आवाहन प्रा़ सकटे यांनी केले़ अ‍ॅड़ एकनाथ आव्हाड यांनी, मातंग समाज व तत्सम जातींना आरक्षण द्यावे़ यासाठी १३ टक्के व पूर्वीचे ३ टक्के असे मिळून अनुसूचित जातीच्या १६ टक्के आरक्षणात अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी केली़ अ‍ॅड़ भांगे यांनी आरक्षणाबाबत काही तांत्रिक व कायद्याच्या बाबी स्पष्ट केल्या़ लोकसंख्येच्या आधारावर मातंग आरक्षणाची मागणी न्यायिक व कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचे ते म्हणाले़ मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याची भूमिका परिषदेचे निमंत्रक अविनाश घाटे यांनी व्यक्त केली़ प्रारंभी सादर केलेला क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग ग्राह्य धरावा तसेच मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन राजकीय पक्षाची स्थापना करावी, असा ठराव परिषदेत घेण्यात आला़ बैठकीस प्रा़ कन्हैया पाटोळे, लालसेनेचे गणपत भिसे, बबन शिर्के, रामचंद्र भरांडे, के़ डी़ उफाडे, सतीश कवडे, प्रा़ शंकर गड्डमवार, रविंद्र भालेराव, नामदेव गुंडीले, श्याम गडंबे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)