शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

रिक्षाचालकांच्या रांगेत टॅक्सीचालकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

१५०० रुपयांच्या मदतीसाठी केले अर्ज कोरोना संकट : आरटीओ कार्यालयाने नाकारले अर्ज, कोरोनाने आणली अशीही वेळ संतोष हिरेमठ औरंगाबाद ...

१५०० रुपयांच्या मदतीसाठी केले अर्ज

कोरोना संकट : आरटीओ कार्यालयाने नाकारले अर्ज, कोरोनाने आणली अशीही वेळ

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, जिल्ह्यात त्यासाठी ८ हजार ४५९ रिक्षाचालकांनी अर्ज केले; परंतु या अर्जांमध्ये काही टॅक्सीचालकांचेही अर्ज आले. मात्र, ही बाब निदर्शनास आली आणि आरटीओ कार्यालयाने त्यांचे अर्ज नाकारले; पण कोरोनामुळे रिक्षाचालकांप्रमाणे टॅक्सीचालकांवरही आर्थिक संकट ओढावल्याचेच हे वास्तव आहे.

कोरोनासारख्या महामारीला गेल्या दीड वर्षापासून सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध लावण्यात आले. परिणामी, अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. रिक्षाचालक हा त्यातीलच एक वर्ग. औरंगाबाद जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांना २० मेपासून दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अर्ज केलेल्या ८ हजार ४५९ रिक्षाचालकांपैकी जवळपास साडेसहा हजार रिक्षाचालकांना मदत मिळालेली आहे. यात मदतीच्या आशेने काही टॅक्सीचालकांनीही अर्ज केले; परंतु अर्जांच्या पडताळणीत ही बाब आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर आली. त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. दीड हजार ही रक्कम फार मोठी नाही; परंतु या रकमेसाठी टॅक्सीचालकांनीही अर्ज करण्याची वेळ कोरोनाने आणली.

१,५५० अर्ज दुरुस्तीसाठी परत

प्राप्त झालेल्या रिक्षाचालकांच्या अर्जांपैकी ६ हजार ९०९ अर्ज आरटीओ कार्यालयाने मंजूर केले, तर १,५५० अर्ज दुरुस्तीसाठी परत करण्यात आले आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड देण्यात आल्यासह अन्य कारणांमुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

----

रिक्षाचालकांनी अर्ज करावे

कार, टॅक्सीचालकांनी अर्ज केले होते. त्यांचे हे अर्ज नाकारण्यात आले आहेत. आतापर्यंत साडेसहा हजार रिक्षाचालकांना अर्थसाह्य करण्यात आलेले आहे. या अर्थसाह्यासाठी पात्र रिक्षाचालकांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रमाण कमी आहे. जास्तीत जास्त परवानाधारक रिक्षाचालकांनी अर्ज करावा.

- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

-----

-अर्थसाह्यासाठी पात्र परवानाधारक रिक्षाचालक-२२,०००

-आतापर्यंत अर्ज केलेले रिक्षाचालक-८,४५९

- अर्थसाह्यासाठी अर्ज मंजूर-६,९०९