शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी आता ‘टास्कफोर्स’

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे. परिणामी अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. हाच प्रश्न लक्षात घेवून आता अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘टास्कफोर्स’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम एजन्सीला दिले जाणार आहे.पालिकेकडे अतिक्रमणाच्या तक्रारींचा सातत्याने ओघ असतो. परंतु, अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. एखादी तक्रार आल्यानंतर स्पॉटला जावून पहाणी करून चौकशी करणे, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर आदी पक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असे. परंतु, अनेकवेळा मोहिमेसाठी पुरेशे कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे कार्यवाहीमध्ये अडथळे येत होते. हाच प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम आता एजन्सीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा पक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी अतिक्रमण हटविण्यास प्रक्रियेस आता गती मिळेल, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असे. याचा फटका शहरातील साफसफाईलाही बसत असे. हा प्रश्न लक्षात घेवून आता यासाठी ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेस गती येईल, असे पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.