शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

अतिक्रमण हटविण्यासाठी आता ‘टास्कफोर्स’

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे. परिणामी अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. हाच प्रश्न लक्षात घेवून आता अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘टास्कफोर्स’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम एजन्सीला दिले जाणार आहे.पालिकेकडे अतिक्रमणाच्या तक्रारींचा सातत्याने ओघ असतो. परंतु, अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. एखादी तक्रार आल्यानंतर स्पॉटला जावून पहाणी करून चौकशी करणे, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर आदी पक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असे. परंतु, अनेकवेळा मोहिमेसाठी पुरेशे कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे कार्यवाहीमध्ये अडथळे येत होते. हाच प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम आता एजन्सीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा पक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी अतिक्रमण हटविण्यास प्रक्रियेस आता गती मिळेल, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असे. याचा फटका शहरातील साफसफाईलाही बसत असे. हा प्रश्न लक्षात घेवून आता यासाठी ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेस गती येईल, असे पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.