शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अतिक्रमण हटविण्यासाठी आता ‘टास्कफोर्स’

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा अवलंब केला जात होता. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असे. परिणामी अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. हाच प्रश्न लक्षात घेवून आता अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘टास्कफोर्स’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम एजन्सीला दिले जाणार आहे.पालिकेकडे अतिक्रमणाच्या तक्रारींचा सातत्याने ओघ असतो. परंतु, अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास विलंब होत होता. एखादी तक्रार आल्यानंतर स्पॉटला जावून पहाणी करून चौकशी करणे, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर आदी पक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असे. परंतु, अनेकवेळा मोहिमेसाठी पुरेशे कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे कार्यवाहीमध्ये अडथळे येत होते. हाच प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम आता एजन्सीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा पक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी अतिक्रमण हटविण्यास प्रक्रियेस आता गती मिळेल, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असे. याचा फटका शहरातील साफसफाईलाही बसत असे. हा प्रश्न लक्षात घेवून आता यासाठी ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेस गती येईल, असे पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.