शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरेना

By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) सामूहिक शेततळ्यांसाठी जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) सामूहिक शेततळ्यांसाठी जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु यंदा जुलै महिना संपत आला तरी चालू वर्षाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट ठरलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.चार वर्षांपासून संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळून निघत आहे. या पार्श्वभूमीवर फलोत्पादक शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अधिकच महत्त्व वाटत आहे. राष्ट्रीय फलोत्पादक अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी शंभर टक्के अनुदान मिळत असल्यामुळे या शेततळ्यांना आधीच भरपूर मागणी आहे. आता ही मागणी आणखी वाढली आहे. परंतु यंदा जुलै महिना संपला तरी या योजनेचा निधी किंवा उद्दिष्ट ठरलेले नाही. मागील वर्षी जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत जे शेततळ्यांचे उद्दिष्ट होते, ते उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा ही मागणी आणखी वाढली आहे. दररोज शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु उद्दिष्टच ठरलेले नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. या योजनेत सामूहिक तत्त्वावर म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादक शेतकऱ्यांना एक शेततळे मंजूर केले जाते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे फळबागा असणे आवश्यक आहे. या योजनेत शेततळे खोदणे आणि त्यात प्लास्टिक पन्नी टाकण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.