शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

...तर २०२४ नंतर मोदी निवडणुका होऊ देणार नाहीत : भाई वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 22:50 IST

नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले

मयूर देवकर औरंगाबाद, दि. 27 - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एक त्र येण्याचे आवाहन केले. ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदे’तर्फे गुरुवारी (दि.२७) आयोजित ‘संघर्ष परिषदे’मध्ये ते बोलत होते.‘पुरोगामी, डाव्या आंबेडकरी चळवळींसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारची तुलना हिटलरच्या हुकूमशाहीशी केली. ते म्हणाले, ज्या प्रकारे हिटलरने विरोधकांना समूळ नष्ट करून स्वत:चे अराजक साम्राज्य स्थापित केले, त्याच्याशी साम्य असणारी परिस्थिती सध्या भारतात आहे. संघप्रणीत मोदी सरकारचे दडपशाहीचे धोरण पाहता २०१९ मध्ये जर त्यांचा विजय झाला, तर २०२४ नंतर आपल्या देशात निवडणुका होणार नाहीत, अशी भीती वाटते. लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आले आहे.भारताला हिंदू राष्ट्र करताना भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना बदलण्यासही संघ कचरणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे नाझी साम्राज्याचा बीमोड करण्यासाठी मित्र देश एकत्र आले होते, त्याप्रमाणे समाजातील सर्व गोरगरीब, मागास, वंचित, पीडित, दलित, परिवर्तवादी, समाजवादी, डावे यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याची गरज आहे. तरच हे धोकादायक आव्हान पेलले जाऊ शकते, असे वैद्य म्हणाले. उपेक्षितांच्या संघर्षाबाबत सुभाष लोमटे म्हणाले की, एकाच विचारांसाठी लढणाºया विविध संघटनांचे विघटन जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत भांडवलशाही व जातीयवादी शत्रूशी दोन हात करता येणार नाहीत. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, लोकशाहीमध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने दडपशाही करून अल्पसंख्याकांना दुर्बल केले जात आहे. ३९ वर्षांपूर्वी २७ जुलै रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत पारित झाला होता. त्याचे औचित्य साधून गुरुवारी संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘संघर्ष परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. यावेळी मंचावर रमेश खंडागळे, मिलिंद पाटील, अजमल खान, भीमराव सोनवणे, लक्ष्मण जाधव पाटील, राम बाहेती, अण्णा खंदारे, वर्षा गुप्ते आदींची उपस्थिती होती.हा इतिहास का सांगत नाही?

नरेंद्र मोदी वेद-पुराणांतील कथांचे दाखले देऊन भारतात कशी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची, आदर्श नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आहे याचा सगळीकडे प्रचार करतात. मात्र, आमच्या देशात हजारो वर्षांपासून दलितांवर किती अत्याचार आणि अन्याय केला जातोय याविषयी ते का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा १३४ वा क्रमांक आहे याकडे भाई वैद्य यांनी लक्ष वेधले.