शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नळ कनेक्शन १० हजारांत

By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने.

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने. १ सप्टेंबरपर्यंत नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी ३ ते ७ हजार रुपयांपर्यंत रक्कम मनपा घ्यायाची. आता ती रक्कम १० हजार रुपयांहून अधिक लागणार आहे. ऐन दिवाळसणाच्या तोंडावर आणि विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने ‘नवीन नळ जोडणी आता सर्वांत सोपी,’ असे जाहीर करून नागरिकांच्या खिशात हात घालून साडेतीन हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळण्याचा निर्णय घेतला आहे.५ वर्षांच्या काळात १० हजार रुपयांचे शुल्क हप्त्याने भरण्याची सवलत नागरिकांना देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नळ जोडणी आपल्या दारी असे सांगून कंपनीने मनपाच्या निर्देशानुसारच नवीन नळ कनेक्शन महाग होणार असल्याचे कळविले असले, तरी १० हजार रुपयांहून अधिकची रक्कम किती असेल हे कळविलेले नाही. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन २० हजार रुपयांपर्यंतही जाऊ शकते. ग्राहकांच्या सोयीसाठी सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या ज्या भागामध्ये मनपाच्या जलवाहिन्या आलेल्या आहेत. तेथेच नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. नवीन नळ जोडणी किती दिवसांत होईल, हे कंपनीने कळविलेले नाही.ही देण शिवसेना- भाजपाचीपाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शिवसेना- भाजपाने मिळून घेतला आहे. ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनीची योजना तयार करून त्या युतीने औरंगाबादकरांच्या माथी ही योजना १३ लाख लोकांचा विरोध पत्करून लादली आहे. केंद्रातील तत्कालीन संपुआ व राज्यातील आघाडी शासनाने ४०० कोटी रुपयांचा निधी समांतर जलवाहिनीसाठी दिला. पीपीपी मॉडेलवरील या योजनेत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या मोबदल्यात मनपाने २० वर्षांसाठी कंपनीला पाणीपट्टी वसुली करणे, मीटर बसविणे, नळ कनेक्शन देणे, पाणीपुरवठा करणे, देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी दिली. शिवाय, जलवाहिनीचे काम झाल्यावर दर तीन वर्षांनी २५ टक्के पाणीपट्टी वाढ करण्याचा ठरावही मंजूर करून दिला. सध्या ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी आहे. एप्रिल २०१५ पासून ३,५०० रुपये पाणीपट्टी होणार आहे. महापालिकेने मोठा गाजावाजा करून खाजगीकरण केले. याचे दूरगामी परिणाम औरंगाबादकरांना सहन करावे लागणार आहेत.