शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

नळ कनेक्शन १० हजारांत

By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने.

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने. १ सप्टेंबरपर्यंत नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी ३ ते ७ हजार रुपयांपर्यंत रक्कम मनपा घ्यायाची. आता ती रक्कम १० हजार रुपयांहून अधिक लागणार आहे. ऐन दिवाळसणाच्या तोंडावर आणि विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने ‘नवीन नळ जोडणी आता सर्वांत सोपी,’ असे जाहीर करून नागरिकांच्या खिशात हात घालून साडेतीन हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळण्याचा निर्णय घेतला आहे.५ वर्षांच्या काळात १० हजार रुपयांचे शुल्क हप्त्याने भरण्याची सवलत नागरिकांना देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नळ जोडणी आपल्या दारी असे सांगून कंपनीने मनपाच्या निर्देशानुसारच नवीन नळ कनेक्शन महाग होणार असल्याचे कळविले असले, तरी १० हजार रुपयांहून अधिकची रक्कम किती असेल हे कळविलेले नाही. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन २० हजार रुपयांपर्यंतही जाऊ शकते. ग्राहकांच्या सोयीसाठी सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या ज्या भागामध्ये मनपाच्या जलवाहिन्या आलेल्या आहेत. तेथेच नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. नवीन नळ जोडणी किती दिवसांत होईल, हे कंपनीने कळविलेले नाही.ही देण शिवसेना- भाजपाचीपाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शिवसेना- भाजपाने मिळून घेतला आहे. ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनीची योजना तयार करून त्या युतीने औरंगाबादकरांच्या माथी ही योजना १३ लाख लोकांचा विरोध पत्करून लादली आहे. केंद्रातील तत्कालीन संपुआ व राज्यातील आघाडी शासनाने ४०० कोटी रुपयांचा निधी समांतर जलवाहिनीसाठी दिला. पीपीपी मॉडेलवरील या योजनेत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या मोबदल्यात मनपाने २० वर्षांसाठी कंपनीला पाणीपट्टी वसुली करणे, मीटर बसविणे, नळ कनेक्शन देणे, पाणीपुरवठा करणे, देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी दिली. शिवाय, जलवाहिनीचे काम झाल्यावर दर तीन वर्षांनी २५ टक्के पाणीपट्टी वाढ करण्याचा ठरावही मंजूर करून दिला. सध्या ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी आहे. एप्रिल २०१५ पासून ३,५०० रुपये पाणीपट्टी होणार आहे. महापालिकेने मोठा गाजावाजा करून खाजगीकरण केले. याचे दूरगामी परिणाम औरंगाबादकरांना सहन करावे लागणार आहेत.