शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

तंटामुक्त समित्या निवडीवरून तंटे

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत.

कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या समित्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे वर्षभरात १२२ पैकी एकाही समितीने एकही तंटा मिटविलेला नाही. यामुळे या समित्यांना आपल्या कामांचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी, अंभोरा या पोलीस ठाण्यांतर्गत १२२ ग्रामपंचायती येतात. या गावांमध्ये उद्भवलेले वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येते. यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही प्रयत्न करतात. गावामध्ये तंटे होऊन ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तंट्यामुळे ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतात. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच; शिवाय वेळही वाया जातो. असे प्रकार आष्टी तालुक्यात होऊ नयेत यासाठी १२२ ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. असे असले तरी धानोरा, डोंगरगण, शेरी, जळगाव, हातोला, धामनगाव, दौलावडगाव, सावरगाव, कारखेलसह इतर एकाही ठिकाणच्या समितीने या वर्षात एकही तंटा मिटविला नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. यासह अनेक ठिकाणच्या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. या समितीचे अध्यक्षपद हे ग्रामसभेने ठरविणे गरजेचे असते. अध्यक्षपदासह सदस्यही ग्रामपंचायतने ठरविणे अपेक्षीत आहे. असे असताना आष्टी तालुक्यातील अनेका ठिकाणच्या समित्यांमधील अध्यक्षांसह सदस्यही सरपंच व ग्रामसेवकांनी परस्परच ठरविले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. या समित्यांमधील अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थांना विचारात न घेता निवडले गेल्याने इतर ग्रामस्थांमध्ये या समित्यांविषयी रोष आहे. यामुळे गावामध्ये निर्माण झालेला तंटे सोडविण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा यावरही खल होतो. सदरील योजना २००५ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायतला जिल्हा तसेच राज्य स्तरीय बक्षीसही देण्यात येते. यामुळे सुरुवातीला या मोहिमेमध्ये ग्रामपंचायतने हिरीरीने सहभाग घेतला होता. आता मात्र या समित्यांमध्ये राजकारण शिरू लागल्याने अनेक ठिकाणी या समित्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या उद्देशालाच खीळ बसली आहे. यामुळे या समित्यांमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी दादा गव्हाणे, सचिन वाघुले यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या शेतीच्या बांधासह इतर किरकोळ कारणांवर वाद होत आहेत. असे प्रकार मिटविण्यासही कोणी पुढाकार घेत नाही. असे प्रकार होऊ नये, म्हणून काही समित्यांना पुनर्रचना करण्याची मागणी अशोक वाघुले यांनी केली आहे. पोनि शशिकांत डोके म्हणाले, समित्यांविषयी वाद मिटवू व तंटे मिटविण्याचे प्रयत्न करू. (वार्ताहर)