शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

तंटामुक्त गावे बक्षिसांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

विठ्ठल भिसे,पाथरी महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना शासनाकडून अद्यापही बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही़

विठ्ठल भिसे,पाथरीमहात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना शासनाकडून अद्यापही बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही़ या गावांची तपासणी झाल्यानंतर पुरस्काराची निवड झाली़ गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सवही साजरा करण्यात आला़ परंतु, प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे आता गावकऱ्यांमध्ये नाराजी उमटू लागली आहे़ राज्य शासनाने २००८ साली राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली़ गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे, जुने तंटे तडजोडीतून सोडविता आले पाहजे आणि इतर विविध निषक देऊन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यासाठी शासनस्तरावरून मोठी जनजागृती करण्यात आली़सुरुवातीच्या काही वर्षात या मोहिमेंतर्गत गावांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला़ प्रत्यक्षात या योजनेमधील निकषही पूर्ण केले़ गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला़ कालांतराने या योजनेला राजकीय स्वरुप येऊ लागले़ तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या़ तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळाले की, आपण गावाचा न्याय निवाडा करू असा समजही झाला़ परंतु, कालांतराने या मोहिमेमध्ये गाव पातळीवर नागरिकांचा सहभाग कमी होत गेला़ असे असले तरी या मोहिमेंतर्गत दरवर्षी तालुका आणि जिल्हास्तरावर समित्यांची तपासणीही केली जाते़काही इच्छुक ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊन योजनेचे निकषही पूर्ण करतात़ परंतु, शासनाकडून या योजनेसाठी निवड झालेल्या गावांना विसर पडला असल्याचे दिसून येत आहे़ पाथरी तालुक्यात २०१२-१३ या वर्षात तंटामुक्त अभियानामध्ये बक्षीसासाठी सहा गावांची निवड झाली़ यात लोणी बु़, वाघाळा, लिंबा, गौंडगाव, पाथरगव्हाण खुर्द आणि कानसूर या गावांचा समावेश आहे़ शासनाकडून या गावांना अद्यापही बक्षीस देण्यात आले नाही किंवा गावाचा सन्मानही करण्यात आला नाही़ आजही येथील ग्रामस्थ बक्षीसाच्या रक्कमेसाठी आणि सन्मानासाठी आतूर झाले आहेत़ समित्यांचा उत्साहात मावळलागावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी शासनाने ही योजना राबविली़ पण, संबंधित गावांना योग्यवेळी योग्य सन्मान व बक्षीस देण्यात येत नसल्यामुळे तंटामुक्त समित्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे़ यामुळे शासनाने बक्षीसासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना गौरव करून प्रोत्साहन द्यावे, अशी प्रतिक्रिया लोणी बु़चे सरपंच रवींंद्र धर्मे यांनी दिली़