शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

तंटामुक्त गावे बक्षिसांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

विठ्ठल भिसे,पाथरी महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना शासनाकडून अद्यापही बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही़

विठ्ठल भिसे,पाथरीमहात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना शासनाकडून अद्यापही बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही़ या गावांची तपासणी झाल्यानंतर पुरस्काराची निवड झाली़ गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सवही साजरा करण्यात आला़ परंतु, प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे आता गावकऱ्यांमध्ये नाराजी उमटू लागली आहे़ राज्य शासनाने २००८ साली राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली़ गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे, जुने तंटे तडजोडीतून सोडविता आले पाहजे आणि इतर विविध निषक देऊन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यासाठी शासनस्तरावरून मोठी जनजागृती करण्यात आली़सुरुवातीच्या काही वर्षात या मोहिमेंतर्गत गावांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला़ प्रत्यक्षात या योजनेमधील निकषही पूर्ण केले़ गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला़ कालांतराने या योजनेला राजकीय स्वरुप येऊ लागले़ तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या़ तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळाले की, आपण गावाचा न्याय निवाडा करू असा समजही झाला़ परंतु, कालांतराने या मोहिमेमध्ये गाव पातळीवर नागरिकांचा सहभाग कमी होत गेला़ असे असले तरी या मोहिमेंतर्गत दरवर्षी तालुका आणि जिल्हास्तरावर समित्यांची तपासणीही केली जाते़काही इच्छुक ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊन योजनेचे निकषही पूर्ण करतात़ परंतु, शासनाकडून या योजनेसाठी निवड झालेल्या गावांना विसर पडला असल्याचे दिसून येत आहे़ पाथरी तालुक्यात २०१२-१३ या वर्षात तंटामुक्त अभियानामध्ये बक्षीसासाठी सहा गावांची निवड झाली़ यात लोणी बु़, वाघाळा, लिंबा, गौंडगाव, पाथरगव्हाण खुर्द आणि कानसूर या गावांचा समावेश आहे़ शासनाकडून या गावांना अद्यापही बक्षीस देण्यात आले नाही किंवा गावाचा सन्मानही करण्यात आला नाही़ आजही येथील ग्रामस्थ बक्षीसाच्या रक्कमेसाठी आणि सन्मानासाठी आतूर झाले आहेत़ समित्यांचा उत्साहात मावळलागावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी शासनाने ही योजना राबविली़ पण, संबंधित गावांना योग्यवेळी योग्य सन्मान व बक्षीस देण्यात येत नसल्यामुळे तंटामुक्त समित्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे़ यामुळे शासनाने बक्षीसासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना गौरव करून प्रोत्साहन द्यावे, अशी प्रतिक्रिया लोणी बु़चे सरपंच रवींंद्र धर्मे यांनी दिली़