शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात

By admin | Updated: January 30, 2016 00:26 IST

सितम सोनवणे , लातूर पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे.

सितम सोनवणे , लातूरपिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे. परिणामी, भावही वधारले आहेत. २०० लिटर्स क्षमतेच्या टाक्यांपासून १२०० लिटर्स क्षमतेच्या टाक्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार व्यावसायिक टाक्या तयार करून देत आहेत. शिवाय, प्लास्टिकच्या तयार असलेल्या टाक्यांनाही मागणी आहे. दोनशे, तीनशे लिटर्सच्या प्लास्टीकच्या टाक्या, दोनशे लिटर्सचे कॅन व बॅरल व प्लास्टीक घागरी तसेच दीड हजार, तीन हजार, सात हजार आणि बारा हजार लिटर्सच्या लोखंडी टाक्या बनविण्यासाठी व्यावसायिक व्यस्त आहेत. ३५ लिटरपासून १ हजार लिटर्सपर्यंत प्लास्टीकच्या टाक्या बाजारात उपलब्ध आहे. १५० रुपयांपासून ४५०० रुपये किंमत या टाक्यांची आहे. ३५ लिटरच्या टाक्या दिवसाकाठी लातूरच्या बाजारातून किमान शे-दीडशे टाक्या विक्रीला जात आहेत. तर पुढील लिटर्स क्षमतेच्या टाक्या शंभरच्या आसपास दररोज जातात. यातही लाखांच्या घरात उलाढाल झाली आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या खिशाला यामुळे चाटच बसत आहे. १७ लिटर्स प्लास्टीकची घागर ८० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे. ८० रुपयांची घागर एका दुकानातून दिवसाला किमान १२ विकल्या जातात. लातूर शहरात अशा घागरींची शंभर दुकाने आहेत. १२०० घागरींची विक्री होते. म्हणजे ९६ हजार रुपये घागरी खरेदीपोटी लातूरच्या नागरिकांना मोजावे लागत आहेत. दीड हजार लिटर्स, ३ हजार लिटर्स आणि १२ हजार लिटर्स क्षमतेच्या लोखंडी टाक्यांनाही मागणी वाढली आहे. या टाक्या मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून दिल्या जात आहेत. दीड हजार लिटर्सची टाकी २० हजारांना, ३ हजार लिटर्सची टाकी ३२ हजारांना आणि १२ हजार लिटर्सची टाकी ४० ते ५० हजार रुपयांना विक्री केली जात आहे. सहा टाक्या दिवसाकाठी विकल्या जातात. यातून विक्रेत्यांना १ लाख ८४ हजार रुपये मिळतात. ही उलाढाल एका दिवसाची आहे. पाणीटंचाई तीव्र झाल्यामुळे साठवणीचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, या वस्तूंचे भाव वधारले आहेत.