शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

टँकर ८० टक्क्यांनी घटले!

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये आजही पाणी उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या ८० टक्क्यांनी म्हणजेच सव्वाचारशेने घटली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २१२ तर दुसऱ्या टप्प्यात १८६ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेबरोबर अनेक खाजगी कंपन्या व सेवाभावी संस्थानी जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेतला.वर्र्ष २०१५-१६ मध्ये लोकसहभागातून १७ कोटी रुपये खर्चून ५५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला, तर २८८ किलोमीटर नालाखोलीकरण करण्यात आले. त्यामुळे ४९ हजार ५५० हेक्टर सिंचनाखाली आले. त्यातच मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमधील शासकीय व खाजगी विहिरींमध्ये मे, जूनमध्ये पाणी उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे वाढणाऱ्या टँकरच्या संख्येवर झाला आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण भागात तब्बल ५४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. हा आकडा यंदा केवळ १२२ वर आला आहे. यामध्ये खाजगी टँकरची संख्या १०१, तर शासकीय टँकरची संख्या केवळ २१ आहे.भोकरदन तालुक्यात मागील वर्षी १९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा केवळ ४६ आहे. बदनापूर तालुक्यातील २९ गावांना सध्या २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, ही संख्या मागील वर्षी १६४ होती. घनसावंगी व अंबड तालुक्यातील सहा गावे मिळवून केवळ आठ टँकर सुरू आहेत. हा आकडा मागील वर्षी १६३ वर पोचला होता. परतूर व मंठ्यातील सात गावांमध्ये सध्या सात टँकर सुरू आहेत, ही संख्या मागील वर्षी ९५ वर पोचली होती. जाफराबाद तालुक्यात गत वर्षी १५३ टँकर सुरू होते, यंदा हा आकडा केवळ ३१ आहे. एकंदरीत जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेवर फुंकर घालण्याचे काम जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या चळवळीमुळे शक्य झाले आहे.