शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

टँकर ८० टक्क्यांनी घटले!

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये आजही पाणी उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या ८० टक्क्यांनी म्हणजेच सव्वाचारशेने घटली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २१२ तर दुसऱ्या टप्प्यात १८६ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेबरोबर अनेक खाजगी कंपन्या व सेवाभावी संस्थानी जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेतला.वर्र्ष २०१५-१६ मध्ये लोकसहभागातून १७ कोटी रुपये खर्चून ५५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला, तर २८८ किलोमीटर नालाखोलीकरण करण्यात आले. त्यामुळे ४९ हजार ५५० हेक्टर सिंचनाखाली आले. त्यातच मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमधील शासकीय व खाजगी विहिरींमध्ये मे, जूनमध्ये पाणी उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे वाढणाऱ्या टँकरच्या संख्येवर झाला आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण भागात तब्बल ५४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. हा आकडा यंदा केवळ १२२ वर आला आहे. यामध्ये खाजगी टँकरची संख्या १०१, तर शासकीय टँकरची संख्या केवळ २१ आहे.भोकरदन तालुक्यात मागील वर्षी १९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा केवळ ४६ आहे. बदनापूर तालुक्यातील २९ गावांना सध्या २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, ही संख्या मागील वर्षी १६४ होती. घनसावंगी व अंबड तालुक्यातील सहा गावे मिळवून केवळ आठ टँकर सुरू आहेत. हा आकडा मागील वर्षी १६३ वर पोचला होता. परतूर व मंठ्यातील सात गावांमध्ये सध्या सात टँकर सुरू आहेत, ही संख्या मागील वर्षी ९५ वर पोचली होती. जाफराबाद तालुक्यात गत वर्षी १५३ टँकर सुरू होते, यंदा हा आकडा केवळ ३१ आहे. एकंदरीत जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेवर फुंकर घालण्याचे काम जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या चळवळीमुळे शक्य झाले आहे.