शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:56 IST

जालना :थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधा, असे आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाअभावी धोक्यात आलेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधा, असे आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले केंद्रेकर यांनी मंगळवारी जालना व बदनापूर तालुक्यांतील काही गावांना भेटी दिल्या. सोबत जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे सोनुने यांच्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी बदनापूर तालुक्यातील म्हात्रेवाडी, तडेगाव, ब्रह्मनाथ तांडा येथील कपाशी, तूर, मका, मूग इ. पिकांची केंद्रेकर यांनी शेतात पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पेरणी, खते, कीटकनाशके यासाठी केलेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील रामनगर, डांबरी, परतूरमधील वाटूर भागांतील पिकांची केंद्रेकर यांनी पाहणी केली. पावसात महिनाभराचा खंड पडल्यामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्यास पुरेसे बियाणे उपलब्ध आहे का, पीकविमा काढण्याचे काम कशा पद्धतीने सुरू आहे. त्याचबरोबर कृषी औजारे वाटप, शेततळे, ठिबक सिंचन या योजनांचे काम जिल्ह्यात कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. शेती उत्पादन वाढीसाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून टेबलवर्क न करता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा तंबी केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.