शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

दाखले न देण्याचा तलाठी संघाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:39 IST

महसूल विभागाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणारे विविध ३५ प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आतापर्यंत हे दाखले तलाठ्याकडूनच देण्यात येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महसूल विभागाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणारे विविध ३५ प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आतापर्यंत हे दाखले तलाठ्याकडूनच देण्यात येत होते.महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून आतापर्यंत वारसा प्रमाणपत्र, वंशावळ पंचनामा, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, निराधार असल्याबाबतचा दाखला, विहीर असल्याचा दाखला, चल, चलसंपतीचा दाखला, बागायतीचे प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, शेतजमिनीचा नकाशा आदी ३५ प्रकारचे दाखले दिले जात होते. मात्र काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. या प्रकरणात महसूल कर्मचारी अडचणीत आले होते. ही बाब लक्षात घेऊन तलाठी संघाने दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात दाखले न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी परंपरागतरीत्या दिल्या जाणाºया या प्रमाणपत्रासाठी आता सामान्य गावकºयांची धावपळ होणार आहे. तलाठी, मंडळ अधिकाºयांकडून दिल्या जाणाºया या प्रमाणपत्रासंदर्भात अधिकृत नमुना किंवा कार्यपद्धती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ संहितेत विषद केला नाही. परिणामी तलाठी, मंडळ अधिकाºयांनी हे प्रमाणपत्र का द्यायचा? असा सवाल तलाठी संघटनेने उपस्थित केला आहे. शासनाने विविध प्रकरणांमध्ये स्वयंघोषणापत्र देवून अर्ज करण्यास मुभा दिली आहे. त्याबाबतचे परिपत्रकही काढले आहे. नागरिकांनी त्या प्रमाणे अर्ज करावेत, असे आवाहन संघटनेने केले आहे.महात्मा गांधी जयंती अर्थात २ आॅक्टोबरपासून तलाठी संघाने संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे ३५ दाखले न देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सुटीचा दिवस होता. मंगळवारी अनेक नागरिक पंचायत समिती कार्यालयात, तलाठी कार्यालयात, मंडळ अधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना नकार मिळाला. परिणामी अनेकांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी खटकेही उडाले.तलाठी व मंडळ अधिकाºयांनी नागरिकांना आपल्या कायदेशीर अडचणीसंदर्भात समजावून सांगावे. तसेच लवकरच या विषयावर शासनाकडून निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. आपली भूमिका समजावून सांगण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.जी. कानगुले, सचिव उदय मिसाळे, कार्याध्यक्ष पठाण, निमंत्रक प्रफुल्ल खंडागळे यांनी केले आहे.