शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी,हमी भावाचा ठराव घ्यावा

By admin | Updated: April 30, 2017 00:23 IST

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत.

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतीमालाला हमी भाव मिळावा, याबाबत ठराव घ्यावा, असे आवाहन कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जेथलिया यांनी म्हटले आहे की, शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे व शेती मालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी सनदशीर प्रयत्न म्हणून विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन केल्याचे जेथलिया यांनी म्हटले आहे. हजारो ग्रामपंचायतींना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. टपालाव्दारेही कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असल्याचे नमूद करुन जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालना जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन मांडण्याच्या अनुषंगाने सर्व कॉँग्रेस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत बैठक घेऊन बाबत रणनिती आखली असल्याची माहिती जेथलिया यांनी पत्रकात दिली आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव या मागणीसाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी राज्य विधीमंडळात अक्रमक भूमिका घेतली असून प्रारंभी अक्रमक भूमिका व त्यांनतर काढण्यात आलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेमुळे सरकार प्रचंड दबावाखाली आले असल्याचे नमूद करुन जेथलिया यांनी म्हटले आहे.