शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कर्जमाफी,हमी भावाचा ठराव घ्यावा

By admin | Updated: April 30, 2017 00:23 IST

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत.

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतीमालाला हमी भाव मिळावा, याबाबत ठराव घ्यावा, असे आवाहन कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जेथलिया यांनी म्हटले आहे की, शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे व शेती मालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी सनदशीर प्रयत्न म्हणून विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन केल्याचे जेथलिया यांनी म्हटले आहे. हजारो ग्रामपंचायतींना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. टपालाव्दारेही कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असल्याचे नमूद करुन जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालना जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन मांडण्याच्या अनुषंगाने सर्व कॉँग्रेस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत बैठक घेऊन बाबत रणनिती आखली असल्याची माहिती जेथलिया यांनी पत्रकात दिली आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव या मागणीसाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी राज्य विधीमंडळात अक्रमक भूमिका घेतली असून प्रारंभी अक्रमक भूमिका व त्यांनतर काढण्यात आलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेमुळे सरकार प्रचंड दबावाखाली आले असल्याचे नमूद करुन जेथलिया यांनी म्हटले आहे.