शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा वाढता धोका समोर ठेवून उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात असला तरीही वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे आदेश ...

औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात असला तरीही वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामे, जि.प.,मनपाच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्वांनी खबरदारी बाळगावी. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असली तरीही सर्व उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवाव्यात. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. कृषी प्रक्रिया उद्योगासाठी एमआयडीसीचे प्राधान्याने जमीन देण्याचे धोरण आहे. त्याचा लाभ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेंतर्गत घ्यावा. असे आवाहन देसाई यांनी केले.

जिल्ह्यातील कोविड नियंत्रण लसीकरणासाठी प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर ते वॉर्डबॉय पर्यंतच्या सर्व जणांची नोंदणी लसीकरणासाठी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याचा टक्का ५३.५०

औरंगाबाद : जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावातील प्रत्येक घरात प्रती व्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाणी उपलब्ध होण्यासाठी नळजोडणीचे ५३.५० उद्दिष्ट पूर्ण केल्याचे जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील मंजूर १३ योजनांपैकी ८ योजनेतील पाणीपुरवठा सुरु आहे. ४ योजना प्रगतीपथावर आहेत. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (स्वतंत्र नळ, पाणीपुरवठा योजनेवर सोलर पंप बसविणे) सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना या अंतर्गत ३८ योजना पूर्ण करुन दुर्गम भागात पाणीपुरवठा केल्याचा दावा गोंदावले यांनी केला. जि.प.च्या सर्व शाळा नियमितपणे सुरू करण्यात आल्या असून सध्या विद्यार्थ्यांची १३ टक्के उपस्थिती आहे. जिल्ह्यात विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्री उपक्रमांतर्गत आजपर्यंत २१ कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला.