शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कोरोनाचा वाढता धोका समोर ठेवून उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात असला तरीही वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे आदेश ...

औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात असला तरीही वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामे, जि.प.,मनपाच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्वांनी खबरदारी बाळगावी. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असली तरीही सर्व उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवाव्यात. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. कृषी प्रक्रिया उद्योगासाठी एमआयडीसीचे प्राधान्याने जमीन देण्याचे धोरण आहे. त्याचा लाभ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेंतर्गत घ्यावा. असे आवाहन देसाई यांनी केले.

जिल्ह्यातील कोविड नियंत्रण लसीकरणासाठी प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर ते वॉर्डबॉय पर्यंतच्या सर्व जणांची नोंदणी लसीकरणासाठी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याचा टक्का ५३.५०

औरंगाबाद : जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावातील प्रत्येक घरात प्रती व्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाणी उपलब्ध होण्यासाठी नळजोडणीचे ५३.५० उद्दिष्ट पूर्ण केल्याचे जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील मंजूर १३ योजनांपैकी ८ योजनेतील पाणीपुरवठा सुरु आहे. ४ योजना प्रगतीपथावर आहेत. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (स्वतंत्र नळ, पाणीपुरवठा योजनेवर सोलर पंप बसविणे) सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना या अंतर्गत ३८ योजना पूर्ण करुन दुर्गम भागात पाणीपुरवठा केल्याचा दावा गोंदावले यांनी केला. जि.प.च्या सर्व शाळा नियमितपणे सुरू करण्यात आल्या असून सध्या विद्यार्थ्यांची १३ टक्के उपस्थिती आहे. जिल्ह्यात विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्री उपक्रमांतर्गत आजपर्यंत २१ कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला.