शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:02 IST

उच्चरक्तदाब आणि मधुमेह सर्वांत पुढे डेथ ऑडिट : आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद, ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक औरंगाबाद : ...

उच्चरक्तदाब आणि मधुमेह सर्वांत पुढे

डेथ ऑडिट : आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद, ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

औरंगाबाद : जिल्ह्यात रोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूला फक्त कोरोनाच कारणीभूत नाही, तर कोरोनासह इतर आजारांमुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होते आणि मृत्यू ओढावत आहे. कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात उच्चरक्तदाब पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मधुमेह आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रित ठेवण्यासह कोरोनाची लक्षणे दिसल्यावर वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

वयाच्या ५०नंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटांतील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाबाधितांत मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. बळींची संख्या आजघडीला २ हजार ४०१ वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मृतांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनी विकार आणि अन्य या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

-------

१५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान एकूण मृत्यू-१,४४१

कोरोनामुळे मृत्यू-४५०

इतर कारणांनी मृत्यू-९९१

------

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार नियंत्रित ठेवले पाहिजे. त्याची औषधी वेळेवर आणि नियमित घेतली पाहिजे. विनाकारण चिंता करू नये. सकारात्मक राहिले पाहिजे. आजार, लक्षणे अंगावर काढू नये. वेळीच उपचार घेतले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते. कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.

- डाॅ. अनिल जाेशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी