शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

वर्ष लोटूनही परीक्षा शुल्क मिळेना

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालयांची शासनाकडे प्रस्तावही दाखल केले. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शासनाकडून परीक्षा शुल्काचे सुमारे ६२ लाख रूपये अद्याप परत मिळालेले नाहीत. त्यामुळे इतर घटकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही शासनाच्या पोकळ घोषणेचा प्रत्येय येवू लागला आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांसह पालकातून तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले. सदरील परिस्थिती लक्षात घेवून शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये उस्मानाबादमधील गावांचाही समावेश झाला. अशा टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाकडून उपाययोजना जाहीर केल्या. त्यापैकीच एक म्हणजे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाला तसे आदेशितही करण्यात आले. त्यानुसार शिक्षण विभागाने मार्च २०१५ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या सुमारे ४ हजार १७८ विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. यासाठी अनेकवेळा पाठपुरवाही करण्यात आला. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधित विद्यार्थ्यांचे १४ लाख २० हजार ५२० रूपये एवढे शुल्क परत मिळालेले नाही. दरम्यान, हाच अनुभव २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना येत आहे. या परीक्षेसाठी सुमारे १३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सदरील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण संचालकाकडे आणि त्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाद्वारे सुमारे ४८ लाख ५८ हजार रूपयांची मागणी केली आहे. परंतु, सदरील रक्कम परत मिळालेली नाही. शासनाच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.