शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष लोटूनही परीक्षा शुल्क मिळेना

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालयांची शासनाकडे प्रस्तावही दाखल केले. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शासनाकडून परीक्षा शुल्काचे सुमारे ६२ लाख रूपये अद्याप परत मिळालेले नाहीत. त्यामुळे इतर घटकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही शासनाच्या पोकळ घोषणेचा प्रत्येय येवू लागला आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांसह पालकातून तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले. सदरील परिस्थिती लक्षात घेवून शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये उस्मानाबादमधील गावांचाही समावेश झाला. अशा टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाकडून उपाययोजना जाहीर केल्या. त्यापैकीच एक म्हणजे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाला तसे आदेशितही करण्यात आले. त्यानुसार शिक्षण विभागाने मार्च २०१५ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या सुमारे ४ हजार १७८ विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. यासाठी अनेकवेळा पाठपुरवाही करण्यात आला. परंतु, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधित विद्यार्थ्यांचे १४ लाख २० हजार ५२० रूपये एवढे शुल्क परत मिळालेले नाही. दरम्यान, हाच अनुभव २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना येत आहे. या परीक्षेसाठी सुमारे १३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सदरील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण संचालकाकडे आणि त्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाद्वारे सुमारे ४८ लाख ५८ हजार रूपयांची मागणी केली आहे. परंतु, सदरील रक्कम परत मिळालेली नाही. शासनाच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.