शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

सव्वाकोटीचा मनपावर बोजा

By admin | Updated: July 17, 2017 00:59 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने शनिवारी महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासनाने शनिवारी महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. मागील अनेक वर्षांपासून मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर अंतिम निर्णय घेऊन शासनाने सर्वपक्षीय नगरसेवकांना ‘खुश’करून टाकले. ही मागणी मान्य होत नाही, तर आणखी एक जुनी मागणी पुढे करण्यात आली आहे. राज्यातील आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनप्रमाणे आम्हालाही पेन्शन योजना लागू करावी, असे बोलल्या जात आहे.शासनाने शनिवारी काढलेल्या अध्यादेशात नगरसेवकांना महापालिकेच्या श्रेणीनुसार मानधन येत असल्याचे नमूद केले आहे. औरंगाबाद महापालिकेचा ‘क’वर्गात समावेश होतो. त्यामुळे नवीन शासन निर्णयानुसार शहरातील ११४ नगरसेवकांना आता दरमहा ७ हजार ५०० ऐवजी १० हजार रुपये मिळणार आहेत. या मानधनामुळे पूर्वी मनपाच्या तिजोरीवर दरमहा ८ लाख ५५ हजार रुपयांचा भार पडत होता. वार्षिक हा भार १ कोटी २ लाख ६० हजार रुपये होता. मानधन वाढीनंतर मनपावर आता दरमहा ११ लाख ४० हजार रुपयांचा बोजा पडेल. वार्षिक बोजा १ कोटी ३६ लाख ८० हजार रुपये राहणार आहे. याशिवाय बैठक भत्ता म्हणून १०० रुपये वेगळे देण्यात येतात. मानधन, बैठक भत्त्यात चहापाण्याचाही खर्च निघत नाही, हे विदारक सत्य आहे.११४ नगरसेवकांमधून काहींची वॉर्ड सभापती म्हणून दरवर्षी निवड होते. एकूण ९ सभापतींची निवड होते. प्रत्येक सभापतीला १५ हजार रुपये मानधन द्यावे लागते. महिन्याला १ लाख ३५ हजार, तर वर्षाला १६ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक भार सभापतींच्या मानधनाचा मनपाला सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे विषय समित्यांच्या सभापतीपदी ५ जणांची वर्णी लावण्यात येते. त्यांनाही १५ हजार रुपये मानधन दिले जाते. महिन्याला ७५ हजार तर वर्षाला ९ लाख रुपये मनपाच्या तिजोरीतून वाटप करावे लागतात. नगरसेवक व सभापतींचे मानधन या सर्वांची गोळाबेरीज केल्यास मनपाच्या तिजोरीतून १ कोटी ६२ लाख रुपये जाणार हे निश्चित.