शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करा

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या प्रकरणांत महापालिका चालढकल पद्धतीने काम करीत आहे.

औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या प्रकरणांत महापालिका चालढकल पद्धतीने काम करीत आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बाबतीत मनपा प्रशासनाने कडक कारवाई न केल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच शासनाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने दिलेल्या सूचनेनुसार महानगरपालिकेने धार्मिक स्थळांचे सर्वेक्षणही केले. नंतर हे सर्वेक्षण वादात सापडले. मनपा प्रशासनाने सरसकट धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून यादी प्रसिद्ध केली. यामध्ये मान्यताप्राप्त अनेक धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीवर सर्वधर्मीय नागरिकांनी मनपाच्या यादीवर आक्षेप नोंदविला होता. नागरिकांचा रोष वाढू लागल्याने महापौर त्र्यंबक तुपे यांनी धार्मिक स्थळांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना सादर केला. दरम्यान, अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होत नसल्यामुळे न्यायालयाने शासनावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे शासनाने २०११ नंतरची बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करून तातडीने कारवाई सुरूकरावी, असे आदेश दिले होते. मात्र, अद्याप शहरात कारवाई सुरू झालेली नाही. असे असतानाच शासनाने नव्याने आदेश देऊन शिस्तभंगाची कारवाई करावी, असे शासनाने मनपाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.