शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

राकाँवर टिकेची झोड

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

बीड : शेतकऱ्यांनी योग्य वेळी पीकविमा भरल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक पीकविमा ३३६ कोटींचा मंजूर झाला आहे. ही बाब स्वागतार्ह नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

बीड : शेतकऱ्यांनी योग्य वेळी पीकविमा भरल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक पीकविमा ३३६ कोटींचा मंजूर झाला आहे. ही बाब स्वागतार्ह नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. हा पीकविमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर खा. डॉ. प्रीतम मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, संचालक फुलचंद मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, सर्जेराव तांदळे, गोविंद केंद्रे, सुभाष सारडा आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, जिल्हा बँकेवर प्रशासक नेमला असताना वसुली कमी व उपलब्ध ठेवी खर्च करण्यात आल्या. बँकेत केवळ १९ कोटी रूपये शिल्लक होते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी स्व. मुंडे व मी समोरासमोर येऊन आरोप केले आहेत. माझ्यावर जे आरोप झाले आहेत त्या आरोपांना मी सामोरे गेली आहे. परंतु काही जण मागून आरोप करीत असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, बँक बुडली असल्याचे माजी अध्यक्षांनी सांगितल्याने बँकेवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे बँकेच्या ठेवी वाढल्या नाहीत. जिल्हा परिषदेतील बोगस कामांचे बादशहा धनंजय मुंडे आहेत हे आपल्याला माहीत आहे.राष्ट्रवादी पक्ष नव्हे, टोळीमेळाव्यात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या बहारदार भाषणामुळे सर्व कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मरगळ दूर झाली. खोत यांनी भाषण सुरू केल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मुलास आता कोणी मुली देत नाहीत. कारण ग्रामीण भागात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. राकाँ-काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी घोटाळे केले. मात्र, चेहऱ्यावर जरासाही लवलेश येऊ दिला नाही. आता भाजपाचे सरकार येऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे तोच शरद पवार आरोप करीत आहेत. राकाँ नेत्यांनी वेगवेगळे घोटाळे केली, धरणे गिळंकृत केली, सर्वसामान्य माणूस देशोधडीला लावला. शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी भावना राष्ट्रवादी पक्षाची नव्हती. राष्ट्रवादी हा पक्ष नसून टोळी आहे. टोळीचे म्होरके शरद पवार यांना मी हल्ली अलीबाबा म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदार, पगारदारांना दुष्काळाचा फरक पडत नाही. दुष्काळाचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो. रा. काँ. ने दलाल निर्माण केल्यामुळे ग्रामीण भागात तरूणांच्या हाताला काम नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी संघटनेने आंदोलन केले तर मंत्रीपदासाठी आंदोलन केले असे म्हटले जाते. जर शांत बसलो तर हिणवले जाते. त्यामुळे शरद पवारांनी आमची काळजी करू नये. तुमच्या कपाळाचे कुंकू का पुसलं (तुमची सत्ता का गेली ?) याचा विचार करा, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)शेतकरी मेळाव्याप्रसंगी डीसीसीचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बुडलेली बँक पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीने कामकाज केले जात आहे. कर्जबाजारी लोकांना जोरजबरदस्ती न करता प्रेमाने सांगितल्यामुळे त्यांनी दीड कोटीहून अधिक रूपये जमा केले आहेत. आगामी काळात वसुली वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.