शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर्वधर्म समभावाचे प्रतीक क्रांतीचौकातील छत्रपतींचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:03 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता.

ठळक मुद्देभावी पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठी २१ मे १९८३ रोजी क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.मागील ३४ वर्षांच्या काळात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, तसेच शहराचा कायापालट झाला त्याचा साक्षीदार महाराजांचा पुतळा ठरला आहे.

औरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. 

भावी पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठी २१ मे १९८३ रोजी क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. मागील ३४ वर्षांच्या काळात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, तसेच शहराचा कायापालट झाला त्याचा साक्षीदार महाराजांचा पुतळा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना समान न्याय्य वागणूक दिली. खर्‍या अर्थाने महाराजांनी त्यावेळी स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा औरंगाबादेतील पुतळाही सर्वधर्म समभावाचा प्रतीक ठरला आहे. मराठवाड्याच्या राजधानीचे वैभव ठरलेल्या छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्याच्या पाठीमागेही शहरवासीयांनी केलेला २१ वर्षांचा पाठपुरावा हा सुद्धा एक इतिहास होय. पुतळा उभारण्यासाठी तेव्हा सर्व धर्मातील नागरिकांनी हातभार लावला होता. सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुतळा उभारण्यासाठी एकजूट दाखविली. पुतळ्याची उभारणी १९८३ मध्ये झाली असली तरीही तो उभारण्यासाठी १९६२ पासून प्रयत्न सुरू झाले होते. त्यावेळी शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील काही मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता. क्रांतीचौकात पुतळा उभारण्यासाठी व ते कार्य तडीस नेण्यासाठी १९८० पर्यंत या गोष्टींचा पाठपुरावा या मंडळींनी केला. 

या काळात महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कल्पनेला शहरवासीयांनी तेव्हा जोरदार पाठिंबा दिला होता. त्यावेळी नगरपालिकेने हे कार्य हाती घेऊन पूर्ण करावे यासाठी चोहोबाजूने मागणी केली होती. परिणती म्हणजे १९८१ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत पुतळा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य जिल्हा परिषद व नगरपालिकेने संयुक्तपणे हाती घ्यावे, असे ठरले. नगराध्यक्ष अलफखाँ यांच्या अध्यक्षतेखाली अश्वारूढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना करण्यात आली होती. सचिव म्हणून प्रकाश मुगदिया यांंची निवड करण्यात आली होती. तसेच समितीमध्ये केशवराव औताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबराव पाटील डोणगावकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अशोक शहा आदींचा समावेश होता. २१ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर क्रांतीचौकात १९८३ मध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. 

एकतेचा संदेश राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन १९८३ मध्ये महाराजांचा पुतळा क्रांतीचौकात उभारला. यातून शहरवासीयांनी सामाजिक एकता, सलोख्याचा संदेश दिला होता. उल्लेखनीय म्हणजे पुतळा उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. त्यांना सर्व धर्मातील लोकांनी साथ दिली व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न साकार झाले. - अशोक शहा, सामाजिक कार्यकर्ते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी1. मुंबईतील शिल्पकार एस. डी. साठे यांनी छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा तयार केला. 2. शिवरायांचा पुतळा १५ फूट उंच व ५ फूट रुंद.3. मुंबईहून ट्रकने ९ मे १९८३ रोजी शहरात पुतळा आणण्यात आला होता. 4. २१ मे १९८३ रोजी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८kranti chowkक्रांती चौकAurangabadऔरंगाबाद