शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘स्वाधार’ शिष्यवृत्तीचा पेच सुटेना; निधी पडून, ‘व्हीपीडीए’साठी कागदपत्रांची प्रतीक्षा

By विजय सरवदे | Updated: June 13, 2024 12:15 IST

 साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागायची. आता समाजकल्याण कार्यालयाकडे तीन महिन्यांपासून निधी पडून आहे, पण ही शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ‘व्हीपीडीए’ या नवीन प्रणालीसाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रेच मिळेनात. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली आहे.

आता या शिष्यवृत्ती योजनेसाठी दोन महिन्यापूर्वी शासनाने काही तांत्रिक बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागार कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाैंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. सध्या समाज कल्याण विभागामार्फत हे ‘व्हीपीडीए’ हे खाते तयार केले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅनकार्ड आणि आधारकार्ड, कॅन्सल चेक जमा करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे चेक नाही, त्यांनी बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जमा केली तरी चालते. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांनी पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडियाचे पासबुक जमा केले आहेत. पण, या तिन्ही बँकांचे ‘आयएफसी’ कोड हे ‘व्हीपीडीए’ खात्याशी जुळत नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांकडूनच कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार विद्यार्थ्यांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयासमोर या शिष्यवृत्तीचा पेच निर्माण झाला आहे.

आता समाज कल्याणलाच विद्यार्थ्यांची प्रतीक्षाशैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्चअखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यांना ‘व्हीपीडीए’ प्रणालीद्वारेच स्वाधार शिष्यवृत्ती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स एवढी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांत खाते असेल, तर त्याऐवजी दुसऱ्या बँकेत खाते उघडून संबंधित कागदपत्रे विनाविलंब सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणच्या जिल्हा कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducation Sectorशिक्षण क्षेत्र