शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणचे ५४०८ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे घेतले स्वॅब

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ५४०८ जणांचे ...

औरंगाबाद : ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ५४०८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी प्राप्त अहवालातून शनिवारी औरंगाबाद व सिल्लोड तालुक्यातून प्रत्येकी एक शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ११ झाली आहे, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा, महाविद्यालयांची संख्या ८२४ आहे. त्यातील ७१३० शिक्षकांची सोमवारपूर्वी तपासणीसाठी नऊ तालुक्यांत तपासण्या सुरू असून शनिवारी सायंकाळपर्यंत ५४०८ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी विषाणू तपासणी व संशोधन प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून तीन दिवसांत ११ जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. हे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर रविवारी उर्वरित १७२२ तपासण्या पूर्ण होतील, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

--

सोमवारपूर्वी तपासण्या पूर्ण

ग्रामीणच्या शिक्षकांच्या तपासण्यांना प्राधान्य दिले जात आहे, तर घाटीत आणखी एक यंत्र कार्यान्वित झाल्याने घाटीची तपासणी क्षमता २२५० पेक्षा अधिक झाली आहे, तर विद्यापीठातील प्रयोगशाळेची क्षमता एक हजार, अशी ३ हजार २०० तपासणीची क्षमता असल्याने सोमवारपर्यंत सर्व शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण होतील असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.