शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

खासगीत मात्र देतात ‘स्वबळाचा नारा’

By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST

औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात.

औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात; परंतु प्रत्यक्ष उघड बोलताना पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हास मान्य असल्याचे सांगत आमच्याच पक्षाची ताकद मोठी असल्याचा दावा मात्र न चुकता करीत आहेत. जागा वाढवून मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी सुरू केलेल्या दबाब तंत्रावर दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया नोंदवीत आहेत. खासगीत बोलताना हे कार्यकर्ते व नेते स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची धुळधाण उडाली; परंतु काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला दोन जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा जोर वधारल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते आहे, तर दबाव तंत्राचे त्यांचे नाटक नेहमीचेच आहे. त्यांना अधिक भाव देऊ नये, असे सांगतानाच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीला त्यांची जागा दिसेल, असे मत काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते व्यक्त करतात.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीनंतर तरी काँग्रेसने आता भानावर येणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी अर्ध्या-अर्ध्या जागांवर लढले पाहिजे. शेवटी पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादीच बळकट आहे, तर शहराध्यक्ष मुश्ताक अहमद त्यापुढेही जाऊन सांगतात की, आम्हाला आता प्रत्येक मतदारसंघातून काम करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातून पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण असावा, याची चाचपणी आम्ही करीत आहोत. आम्ही सातत्याने जनतेच्या संपर्कात आहोत. जनतेची कामे करीत आहोत. पक्षनेत्यांनी आदेश दिल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. काँग्रेसचे किरण पाटील म्हणतात की, काँग्रेस नेत्याची प्रतिमा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तुलनेत चांगली आहे. काँग्रेस नेतृत्व संयमी असून बेलगाम नाही.लोकसभेत फटका बेलगाम प्रवृत्तीचा बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया म्हणाले की, पक्षश्रेष्ठी आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू.राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे डॉ. जितेंद्र देहाडे यांचे मत असे की, राष्ट्रवादीचा हा फॉर्म्युला जुनाच आहे. ते अगोदर दबाब वाढवीत नेतात, नंतर सरेंडर होतात.काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम सावध प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शहरात आमचीच ताकद अधिक आहे; परंतु निर्णय राज्याच्या नेतृत्वाने घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही मतदारसंघांतून लढू शकतो; परंतु यातून विरोधकांचा फायदा होऊ शकतो. हे होऊ नये, असे वाटते; परंतु नाइलाज झालाच तर कठोर निर्णय घ्यावाही लागेल.काँग्रेसने मोठेपणा दाखवावामध्यम मार्ग सुचविताना सुधाकर सोनवणे सांगतात की, लोकसभेत काही मतदारसंघांतून आमच्याकडे उमेदवार नव्हता. मग आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. तसाच मोठेपणा काँग्रेसने दाखवावा. जेथे त्यांचे उमेदवार सतत पराभूत होतात, त्या जागा त्यांनी राष्ट्रवादीला द्यायला काय हरकत आहे.