शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

उमरी लाच प्रकरणातील महिला अधिकाऱ्याचे निलंबन लांबणीवर

By admin | Updated: August 20, 2014 00:17 IST

बी.व्ही. चव्हाण, उमरी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

बी.व्ही. चव्हाण, उमरीयेथील बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड यांना ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली असताना त्या कामावर परत आल्या़ त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़एखाद्या लोकसेवकाला लाच घेताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई लगेच करण्यात येते़ यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी हा एक पहिला व महत्त्वाचा उपाय आहे़ यामुळे जनतेत व लोकसेवकात चांगला संदेश जाण्यास मदत होते़ बळेगाव ता़उमरी येथील मदतनीस कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली़ उमेदवाराला नियुक्तीचे आदेश देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी शांता अमृतराव सुरेवाड यांना रंगेहाथ पकडले होते़ ७ आॅगस्ट रोजी भावसार चौक हनुमान अपार्टमेंट, नांदेड येथे एसीबीचे उपअधीक्षक एम़जी़ पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली़ जामीनावर सुरेवाड यांची सुटका झाली़ त्यामुळे पुन्हा त्या कामावर आल्या़ उमरी ३ अंगणवाडी सेविका, ८ मिनी अंगणवाडी सेविका व १४ मदतनीस अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया झाली़ या प्रक्रियेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करून भरतीप्रक्रिया आटोपण्यात आली़ विशेष म्हणजे कार्यालयातील शिक्के, आदेशाच्या प्रती, निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे रजिस्टर व कागदपत्रे हा दस्तावेज अधिकाऱ्यांनी घरी नेला़ घरातूनच सर्व भरती प्रक्रिया बेदरकारपणे चालू होती़ या गैरप्रकाराबद्दल उमरी तालुक्यातील अनेक उमेदवार व नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ काही घडलेच नाही अशा अविर्भावात संबंधित लाचखोर अधिकारी कामावर आल्या़ एसीबीने त्याच दिवशी सदर कारवाईची माहिती जिल्हा परिषदेला दिली़ मात्र अद्याप त्यावर कसलीच कारवाई झाली नाही़ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्यांंवर लगेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे़ येथे ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई झाली असताना अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत़ उमरीत तहसीलदार उदयकुमार शहाणे, पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, पोलिस जमादार भानुदास वैद्य यानंतर आता बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड अशी सरकारी सेवकांची शृंखला एसीबीच्या जाळ्यात अडकली़ यावरून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जनतेची लुट होत असल्याचे सिद्ध झाले़ यातील पोलिस खात्यातील दोघांचे लगेच निलंबन झाले़ मात्र इतर खात्यातील कर्मचाऱ्यांचे का होत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे़