शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेशन दुकान परवाना प्रक्रियेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांच्या जागी नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांच्या जागी नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे.परभणी जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय गोदामातून धान्याचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले होते. तर १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती. या कारवाईनंतर शासनाच्याच आदेशानुसार नवीन परवाने देण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यानुसार रद्द व निलंबित परवान्याच्या जागी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या प्रक्रियेविरुद्ध काही रेशन दुकानदारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी हे अपील फेटाळले. त्यामुळे या रेशन दुकानदारांनी मंत्र्यांच्या दालनात धाव घेतली.यावेळी दोन्ही बाजुने चर्चा होऊन रद्द झालेल्या रास्तभाव दुकान, केरोसीन परवान्यांविरुद्धचे अपील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा किंवा मंत्र्यांकडे निर्णयासाठी प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी न्यायालय व अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करु नये.तसेच नवीन प्राधिकारपत्र देण्याची कारवाई करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रद्द व निलंबित झालेल्या रेशन परवानाधारकांना दिलासा मिळाला आहे.