शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेशन दुकान परवाना प्रक्रियेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांच्या जागी नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांच्या जागी नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे.परभणी जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय गोदामातून धान्याचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले होते. तर १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती. या कारवाईनंतर शासनाच्याच आदेशानुसार नवीन परवाने देण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यानुसार रद्द व निलंबित परवान्याच्या जागी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या प्रक्रियेविरुद्ध काही रेशन दुकानदारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी हे अपील फेटाळले. त्यामुळे या रेशन दुकानदारांनी मंत्र्यांच्या दालनात धाव घेतली.यावेळी दोन्ही बाजुने चर्चा होऊन रद्द झालेल्या रास्तभाव दुकान, केरोसीन परवान्यांविरुद्धचे अपील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा किंवा मंत्र्यांकडे निर्णयासाठी प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी न्यायालय व अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करु नये.तसेच नवीन प्राधिकारपत्र देण्याची कारवाई करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रद्द व निलंबित झालेल्या रेशन परवानाधारकांना दिलासा मिळाला आहे.