शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात स्थगिती

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

जालना - जिल्हा परिषदअंतर्गत शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नतीची प्रक्रिया ऐनवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे पहिल्याच दिवशी स्थगित करण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारी होणार आहे.

जालना - जिल्हा परिषदअंतर्गत शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नतीची प्रक्रिया ऐनवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे पहिल्याच दिवशी स्थगित करण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे आज जिल्ह्यातून विविध भागातून शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी सभागृहाबाहेर हजर होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत अपंग, विधवा, विदुर यांच्यातून जवळपास ३० जणांच्या पदोन्नतीची प्रक्रिया झाली होती. त्यानंतर पती-पत्नी एकत्रिकरण या अंतर्गत समुपदेशनाद्वारे प्रक्रिया करताना पात्र यादीतील नावे सेवाज्येष्ठतेनुसार नसल्याने गोंधळ उडाला. सभागृहाबाहेर असलेल्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत पदस्थापना सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यानुसार ही पदस्थापना करण्याची मागणी केली. तत्पूर्वी सकाळीही काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आरक्षणाची पदे ही शंभर टक्के भरावीत, असे शासनाचे निर्देश असल्याचे काही शिक्षकांमधून सांगण्यात येत होते. या सर्व गोंधळामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.मंगळवारी सकाळी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ती सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येणार आहे. दरम्यान, अपंगांमधून ५ जणांना पदस्थापना देण्यात आली. तर विधवा, विदुर, परित्यक्त्या यामधून २५ जणांना पदस्थापना देण्यात आली. परंतु प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने मंगळवारी याबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करण्यासाठी पात्र शिक्षकांची जी यादी तयार करण्यात आली, ती प्रसिद्ध करण्यात आली नाही, असा आरोप काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.पदोन्नतीसाठी निवड करताना आरक्षणानुसार करावी व पदस्थापना सेवाज्येष्ठतेनुसार करावी, असे शासनाचे निर्देश आहेत.