शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

गोंधळात स्थगिती

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

जालना - जिल्हा परिषदअंतर्गत शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नतीची प्रक्रिया ऐनवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे पहिल्याच दिवशी स्थगित करण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारी होणार आहे.

जालना - जिल्हा परिषदअंतर्गत शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नतीची प्रक्रिया ऐनवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे पहिल्याच दिवशी स्थगित करण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे आज जिल्ह्यातून विविध भागातून शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी सभागृहाबाहेर हजर होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत अपंग, विधवा, विदुर यांच्यातून जवळपास ३० जणांच्या पदोन्नतीची प्रक्रिया झाली होती. त्यानंतर पती-पत्नी एकत्रिकरण या अंतर्गत समुपदेशनाद्वारे प्रक्रिया करताना पात्र यादीतील नावे सेवाज्येष्ठतेनुसार नसल्याने गोंधळ उडाला. सभागृहाबाहेर असलेल्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत पदस्थापना सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यानुसार ही पदस्थापना करण्याची मागणी केली. तत्पूर्वी सकाळीही काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आरक्षणाची पदे ही शंभर टक्के भरावीत, असे शासनाचे निर्देश असल्याचे काही शिक्षकांमधून सांगण्यात येत होते. या सर्व गोंधळामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.मंगळवारी सकाळी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ती सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येणार आहे. दरम्यान, अपंगांमधून ५ जणांना पदस्थापना देण्यात आली. तर विधवा, विदुर, परित्यक्त्या यामधून २५ जणांना पदस्थापना देण्यात आली. परंतु प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने मंगळवारी याबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करण्यासाठी पात्र शिक्षकांची जी यादी तयार करण्यात आली, ती प्रसिद्ध करण्यात आली नाही, असा आरोप काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.पदोन्नतीसाठी निवड करताना आरक्षणानुसार करावी व पदस्थापना सेवाज्येष्ठतेनुसार करावी, असे शासनाचे निर्देश आहेत.