शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

सस्पेन्स कायम..!

By admin | Updated: January 31, 2017 00:07 IST

उस्मानाबाद :उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. उमेदवारीसाठी इच्छुकांची वाढलेली संख्या पाहून पक्षश्रेष्ठींनी याद्या जाहीर करण्याऐवजी शेवटच्या दिवशी निश्चित केलेल्या उमेदवाराला थेट ‘बी’ फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी प्रमुख पक्षांनी हे पाऊल उचलले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रमुख चारही पक्षांनी निवडणुकांची जय्यत तयारी केली. सेना-भाजपासह इतर पक्षांकडून प्रारंभी युती-आघाडीच्या चर्चा होत होत्या; मात्र, या चर्चा सुरू असतानाच या पक्षांनी दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केली होती. राष्ट्रवादीने निवडणुका जाहीर झाल्यापासून स्वबळावर लढण्याचे अनेकवेळा स्पष्ट केले होते. त्यानुसार गण आणि गटनिहाय बैठकांवर बैठका सुरू होत्या. यावेळी इच्छुकांची सर्वाधिक पसंती राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच उमेदवाराची निवड करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब या तालुक्यात एका जागेसाठी चार ते पाच तर काही मतदारसंघात त्याहून अधिक इच्छूक उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याने पक्षाने उस्मानाबाद पालिका निवडणुकीवेळी वापरलेल्या फॉर्म्युल्याचाच अवलंब यावेळीही करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच दोन दिवस उरले असतानाही बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी थेट ‘बी’ फॉर्म देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. शिवसेनेकडेही इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबतच पालकमंत्री दिवाकर रावते आणि आ. तानाजी सावंत यांनी इच्छूक उमेदवारांशी गट आणि गणनिहाय चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक गटांमधील उमेदवारांचे नाव निश्चित झालेले नाही. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीनेही अखेरच्या दिवशीच नेमके उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार असल्याचे दिसून येते. आ. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरगा, लोहारा तालुक्यात काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर तुळजापूरसह उस्मानाबाद तालुक्यातील इच्छुक उमेदवारांशी आ. मधुकरराव चव्हाण यांनी संवाद साधलेला आहे. काँग्रेस जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याने काही ठिकाणी आणखीनही उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर ज्या ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना कामास लागण्याचे आदेश देण्यात आले असून, इच्छुकांची संख्या सर्वाधिक असलेल्या मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय १ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.