शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हिमायत बागेत दुर्मिळ गावरान आंबा अस्तित्व टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:33 IST

दूधपेडा, दुरी, गुलाबखस, कालापहाड, इम्रती, शेंद्र्या, शक्करगोटी, मारुत्या,  पपय्या... हे काही खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेयांची नावे नाहीत.

ठळक मुद्दे४० वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक जातींचे गावरान आंबे होते.१९७० ला कर लागण्याच्या भीतीने आमराई नष्ट करण्यात आल्या

औैरंगाबाद : दूधपेडा, दुरी, गुलाबखस, कालापहाड, इम्रती, शेंद्र्या, शक्करगोटी, मारुत्या,  पपय्या... हे काही खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेयांची नावे नाहीत. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या गावरान आंब्याची नावे आहेत. पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याच्या आमराई होत्या; मात्र गावरान आंब्याची जागा आता केशर आंब्याने घेतली आहे. यामुळे नवपिढी तर गावरान आंब्याच्या चवीलाच मुकली आहे.  

पूर्वी धोंड्याच्या महिन्यात कांद्याची भजी, कुरडई आणि सोबत रसरसीत गावरान आंबा... सासरच्या या मेजवानीने जावई खुश होऊन जात. गावरान आंबा चोखून खाताना त्याच्या रसाचे डाग शर्ट, बनियनवर पडत, तसेच आमरसाचा डाग पडलेला शर्ट घेऊन मिरविण्यातही त्याकाळी औैरच मज्जा होती.

मात्र, केशर, हापूस आंब्याच्या मार्केटिंगमुळे गावरान आंबा मागे पडला. काळाच्या ओघात गावरान आंब्याच्या असंख्य जाती लुप्त झाल्या आहेत. अनेकांनी जुन्या आमराई तोडून टाकल्या. परिणामी,  आजकालच्या बच्चे कंपनीला गावरान आंब्याची चवच माहिती नाही; मात्र अशा परिस्थितीतही हिमायतबागेत परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हिमायतबागेतील संशोधन केंद्रात गावरान आंब्याचे संवर्धन केले जात आहे.

( फोटोफ्लिक : हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे )

४० वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक जातींचे गावरान आंबे होते. त्या आंब्याचा आकार, रंग, चव, स्थळ व राजांच्या आवडीनुसार गावरान आंब्यांना नाव देण्यात येत असे. काळाच्या ओघात आमराई नष्ट झाल्या, आता फक्त बोटावर मोजण्याइतक्याच गावरान आंब्याच्या जाती शिल्लक राहिल्या आहेत. गावरान आंबे नष्ट होऊ नये म्हणून हिमायत बागेत या जातींचे संवर्धन करण्यात येत आहे. आजही शहरात अनेक आंबेशौैकीन परिवार आहेत. ते हिमायत बागेत जाऊन खास गावरान आंबे खरेदी करतात. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. प्रत्येक गावरान आंब्याची चव, आकार, रंग वेगवेगळा असतो. ते फक्त कृषीशास्त्रज्ञ, विक्रेते व आमराईवाल्यांनाच कळते. हिमायत बागेत या गावरान आंब्यांची मार्च महिन्यापासून कलमे करण्यास सुरुवात होते व जूनमध्ये शेतकरी कलमे घेऊन जातात. गावरान आंब्यावर संशोधन होण्याची व त्या दुर्मिळ जाती पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान कृषीशास्त्रज्ञांसमोर आहे. 

कर लागण्याच्या भीतीने आमराई नष्ट केल्या१९७० च्या कालावधीत शासनाने ठरविले की, श्रीमंत शेतकऱ्यांवर कर बसवायचा. त्यात आंब्याचेही उत्पन्न चांगले असल्याने आंब्यावरही कर लावला. पटवाऱ्यांना झाडे मोजण्याचे आदेश दिले गेले. अनेकांनी त्यावेळी आंब्याची झाडे तोडली. पुढे शासनाने आंब्यावर कर न लावण्याचा निर्णय घेतला; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लोकांनी आमराई नष्ट करून टाकल्या होत्या. कराच्या भीतीने झाडे नष्ट केली. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ झाला. त्याचा फटका मागील दोन दशकांत लोकांना बसला आहे. 

गावरान आंब्यांची चित्र-विचित्र नावे चवीनुसार, रंगानुसार, आकारानुसार, स्थळानुसार गावरान आंब्यांची नावे पडली आहेत. हिमायत बागेत कृषी विद्यापीठ केशर आंबा संशोधन केंद्रांतर्गत  संवर्धन करण्यात आले आहेत. दूधपेडा, दोरी, पपय्या, गुलाबखस, इम्रती, कालापहाड, अंडा, अम्लेट, हूर, बत्ताशा, आचार्या, जाम, गोमाशा, नागीन, फकिऱ्या, खोबऱ्या, दुधी, रताळू, श्रावण्या, शेंद्र्या, शक्कर गोटी, मल्लिका, सिंधू, बसंतबोटी, मारुत्या, गोवामनकुर, निरंजन, रत्ना, मालोदा, चंबू, चौसा या गावरान आंब्यांचा समावेश आहे. औरंगाबादेत निजामाचे राज्य होते तेव्हा हिमायत बाग तयार करण्यात आली. निजामाला जो आंबा पसंत पडला त्यास ‘निजाम पसंत’, त्यांच्या बेगमला आवडलेला आंब्यास ‘बेगमपसंत’, तर सरदारच्या नावाने ‘सरदाऱ्या’ अशा नावांचे आंबेही आहेत. प्रत्येक आंब्याची चव निराळी आहे, अशी माहिती कृषीशास्त्रज्ञ संजय पाटील (फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग) यांनी दिली.

टॅग्स :MangoआंबाNatureनिसर्गAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका