शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जायकवाडीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित ...

औरंगाबाद : जायकवाडीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रविवारी दिले. जिल्ह्यातील सर्व कालव्यांची जलवहन क्षमता वाढविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. किती नुकसान झाले आहे, किती खर्च लागेल, हे सर्वेक्षणानंतर समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या कालव्यांची जलवहन क्षमता कमी झाल्याने या क्षेत्राचे संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, प्रस्ताव प्राप्त होताच तो जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल.

खा. जलील यांच्या मागणीवरून तापी आणि गोदावरी महामंडळाची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. आ. बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यातील सेनी देवगाव उच्च बंधारा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व परवानग्या लवकर देण्याची मागणी केली. तसेच नारंगी-सारंगी धरणामध्ये पालखेड धरणाचे ओव्हर फ्लो होणारे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, शिवना टाकळी धरणाची अनेक कामे अर्धवट आहेत, ती लवकर पूर्ण करावीत. जेणेकरून तालुक्यातला पाणी मिळेल. मण्यार धरणाची उंची वाढवावी, अशीही मागणी केली. आ. बागडे यांनी यावेळी फुलंब्री परिसरातील जल प्रकल्पाच्या क्षेत्रातील जमीन संपादनाबाबत असलेला अडथळा दूर करण्याची सूचना केली.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. सतीष चव्हाण, आ. रमेश बोरनारे, आ. विक्रम काळे, आ. उदयसिंह राजपूत, आ. संजय शिरसाट, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे या बैठकीत उपस्थित होते.