शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

आश्चर्य ! ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक नाकारतात चक्क पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:10 IST

गेल्या ९ वर्षांपासून ‘गट-अ’ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

ठळक मुद्दे राज्यभरातील ७० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना (एआरटीओ) चक्क राजपत्रित अधिकारी गट-ब दर्जा आहेदुसरीकडे या पदापेक्षा कनिष्ठ पदावरील मोटार वाहन निरीक्षकांना मात्र वर्ग-अ दर्जा देण्यात आला आहे.अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

औरंगाबाद : राज्यभरातील ७० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना (एआरटीओ) चक्क राजपत्रित अधिकारी गट-ब दर्जा आहे, तर दुसरीकडे या पदापेक्षा कनिष्ठ पदावरील मोटार वाहन निरीक्षकांना मात्र वर्ग-अ दर्जा देण्यात आला आहे. या दर्जामुळे ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक पदोन्नती नाकारतात. गेल्या ९ वर्षांपासून ‘गट-अ’ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

राज्यभरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची रविवारी (दि.७) शहरात बैठक पार पडली. राज्यभरातील ५५ ‘एआरटीओ’ बैठकीस उपस्थित होते. यावेळी दर्जा आणि वेतनश्रेणीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अधिकार्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, ठाण्याचे तानाजी चव्हाण, औरंगाबादचे ‘एआरटीओ’ रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते यांची उपस्थिती होती. योगेश बाग म्हणाले, २००८ मध्ये एका अधिसूचनेद्वारे मोटार वाहन निरीक्षकांना गट-अ दर्जा देण्यात आला; परंतु ‘एआरटीओ’चा त्यात समावेश झाला नाही. राज्यभरात ‘एआरटीओ’ची १०० पदे असून, यातील ७० पदे भरलेली आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या कामावर देखरेख ‘एआरटीओ’ ठेवतात; परंतु त्यांच्यापेक्षा ‘एआरटीओ’चा दर्जा कमी आहे.

अधिकार मोठे असूनही केवळ दर्जामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.  ‘एआरटीओ’ना असलेल्या ‘ब’ दर्जामुळे ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक पदोन्नती नाकारून ‘अ’ दर्जात कायम राहण्यास प्राधान्य देतात. निर्णय घेतला तर दोन दिवसांत हा दर्जा मिळू शकतो; परंतु ९ वर्षांपासून वारंवार मागणी करूनही ‘अ’ दर्जा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना अनेक बैठकांना हजेरी लावावी लागते. बैठकींना विविध अधिकारी उपस्थित असतात. अशावेळी गट-ब दर्जामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे ‘एआरटीओ’चे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांत आरटीओ कार्यालयातील अधिकारी अडचणींसाठी एकत्र आलेले नाहीत; परंतु प्रथमच महाराष्ट्रातील ‘एआरटीओ’ राजपत्रित अधिकारी गट-अ दर्जा मिळविण्यासाठी एकत्र आले. सध्या वेतनवाढीचा मुद्दा नाही; परंतु हा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

काळ्या फिती लावून कामकाजराजपत्रीत अधिकारी गट-अ (वरिष्ठ) दर्जा मिळावा, यासाठी प्रारंभी निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून एक महिना आरटीओ कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी काळ्या फिती लावून कामकाज करतील, तरीही दुर्लक्ष झाले तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे योगेश बाग म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार