शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी सहकार्य

By admin | Updated: July 13, 2014 00:24 IST

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल,

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.तालुक्यातील बिजेगाव येथील पुनर्वसनाच्या घरबांधकामाची जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पाहणी केली. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, भूसंपादन अधिकारी मोतीयाळे, उपविभागगीय अधिकारी धरमकर, तहसीलदार टी. ए. जाधव, गोविंदराव सिंधीकर, गटविकास अधिकारी व्ही. आर. कोंडेकर, नायब तहसीलदार जाधव, जीवन प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम, कृषी आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम पूर्ण झालेल्यांपैकी काही घरे नादुरुस्त झाली. फरशी फुटली, घरात खड्डे पडले, खडकावर बांधकाम झाल्याने काही घरात खडक जैसे थे आहे. दारे, खिडक्या गंजून खराब झाली व मोडकळीस आली. गावकऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रकार दाखविला. जी घरे दर्जाहीन आहेत व तेथे मोडतोड झाली तेथे तत्काळ दुरुस्ती करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जेवढे घरे पूर्ण झाली त्या घरात लोकांनी वास्तव्य केल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल होईल व बांधकामासाठी पडलेले व इतर साहित्यांची चोरी होणार नाही. त्यासाठी गावकऱ्यांतून, अधिकारी यांची एक स्थानिक समिती बनविण्यात यावी.समितीने केलेल्या सुचनेनुसार प्रशासन योग्य निर्णय घेईल. पर्यायाने बिजेगावचे गेल्या सहा वर्षांपासून रेंगाळलेले पुनर्वसनाचे काम सर्व सुविधांसह दर्जेदार पूर्ण होईल. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे. कामाच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. प्रास्ताविक उपसरपंच दत्तात्रेय बिजेगावकर यांनी केले. (वार्ताहर)उमरीत २२० घरकुले पूर्णबिजेगाव येथील पुनर्वसनाचे काम सन २००८ साली सुरु झाले. एकूण २७४ घरांचे बांधकाम, अंगणवाडी, शाळा, रस्ते, विद्युत व्यवस्था, पाण्याची टाकी आदी कामांचा यात समावेश आहे. सध्या २७४ पैकी २२० घरांचे बांधकाम पूर्णत्वास आले. पुनर्वसनात बांधण्यात येणाऱ्या घरांचा एकूण अंदाजित खर्च ८.५ कोटी एवढा आहे. विविध कारणांमुळे रेंगाळलेले बांधकाम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.