शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करा

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे,

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करुन आगामी काळात काँग्रेस अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले होते. या परिषदेत माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आ. सुरेश जेथलिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. परिषदेला जवळपास १२ हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेनंतर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नसून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात मनरेगाची कामे त्वरित सुरु करावीत, गरज असेल तेथे चारा छावण्या उभाराव्यात, गतवर्षीचे फळबाग विम्याचे पैसे ताबडतोब वाटप करावे, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना जीवंत ठेवण्यासाठी हेक्टरी विशेष अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेश जेथलिया, एम.एम. शेख, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, औरंगाबाद सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, माजी आ. धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, संतोषराव दसपुते, महिला आघाडीच्या अध्यक्षा आयशा मुलानी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.