शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करा

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे,

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करुन आगामी काळात काँग्रेस अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले होते. या परिषदेत माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आ. सुरेश जेथलिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. परिषदेला जवळपास १२ हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेनंतर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नसून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात मनरेगाची कामे त्वरित सुरु करावीत, गरज असेल तेथे चारा छावण्या उभाराव्यात, गतवर्षीचे फळबाग विम्याचे पैसे ताबडतोब वाटप करावे, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना जीवंत ठेवण्यासाठी हेक्टरी विशेष अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेश जेथलिया, एम.एम. शेख, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, औरंगाबाद सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, माजी आ. धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, संतोषराव दसपुते, महिला आघाडीच्या अध्यक्षा आयशा मुलानी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.