शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पुरवठादारांचे नऊ कोटी रु. थकले...

By admin | Updated: December 17, 2015 00:17 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील साखर पुरवठादारांचे ९ कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी ४ कोटींचा निधी मंजूर होऊनही पुरवठा विभागाकडून ती रक्कम साखर नॉमिनींना न दिल्याने ती परत गेल्याचा आरोप होत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील साखर पुरवठादारांचे ९ कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी ४ कोटींचा निधी मंजूर होऊनही पुरवठा विभागाकडून ती रक्कम साखर नॉमिनींना न दिल्याने ती परत गेल्याचा आरोप होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून ही रक्कम मिळत नसल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. साखर पुरवठा करण्यासाठी वाहतूक कमिशन, वेळोवेळी वाढविण्यात आलेले कमिशन, तसेच १० ते २० टक्के वाहतुकीसाठी केलेली कपात, १० टक्के मार्जिन मनी, नॉमिनीकडून घेण्यात आल्यानंतरही पुरवठा विभागाकडून ही रक्कम नॉमिनींना परत करण्यात आलेली नाही. २००१ पासून मार्र्जिन मनी घेण्यात आले, तर २००५ पासून २०१४ पर्यंत १० टक्के कपात केलेली रक्कम थकली आहे. साखर नॉमिनींचे स्वतंत्र रेकॉर्ड जिल्हा पुरवठा कार्यालयात ठेवण्यात आले असले तरी हे रेकॉर्ड सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांसह नॉमिनी हैराण झाले आहेत. या रेकॉर्डमध्ये प्रत्येक नॉमिनींच्या थकीत रकमेची कागदपत्रे असून, त्याआधारे ही रक्कम मिळणार आहे. परंतु रेकॉर्ड गायब झाल्यामुळे पुरवठा विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. साखर नॉमिनींची थकीत रक्कम देण्यास पुरवठा विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही रक्कम मिळालेली नसल्याचे नॉमिनींनी सांगितले.