शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केंद्रीय पद्धतीने पुरवणी परीक्षांचे मूल्यमापन

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे.

औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करता यावा म्हणून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय विभागीय मंडळाने घेतला आहे. विभागात प्रत्येकी तीन मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली असून मंडळ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्वी सप्टेंबर अखेरीस पुरवणी परीक्षेला सुरुवात होत असे; परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून गत वर्षापासून दहावी व यंदापासून बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेतली जात आहे. बारावीच्या (पान ५ वर)फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन जालना जिल्ह्यातील एका वसतिगृहात केले जात असताना पोलिसांनी काही प्राध्यापकांना रंगेहाथ पकडले. तेथील उत्तरपत्रिकाही ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या उत्तरपत्रिकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता. अलीकडे, जप्त केलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी विभागीय मंडळाकडे सुपूर्द केल्या असून मंडळात सध्या संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. ४चौकशी पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर करण्यात आले असून उर्वरित ३२ विद्यार्थ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांचे निकालही लगेच जाहीर केले जातील, असे प्रभारी सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले.