शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

केंद्रीय पद्धतीने पुरवणी परीक्षांचे मूल्यमापन

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे.

औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करता यावा म्हणून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय विभागीय मंडळाने घेतला आहे. विभागात प्रत्येकी तीन मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली असून मंडळ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्वी सप्टेंबर अखेरीस पुरवणी परीक्षेला सुरुवात होत असे; परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून गत वर्षापासून दहावी व यंदापासून बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेतली जात आहे. बारावीच्या (पान ५ वर)फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन जालना जिल्ह्यातील एका वसतिगृहात केले जात असताना पोलिसांनी काही प्राध्यापकांना रंगेहाथ पकडले. तेथील उत्तरपत्रिकाही ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या उत्तरपत्रिकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता. अलीकडे, जप्त केलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी विभागीय मंडळाकडे सुपूर्द केल्या असून मंडळात सध्या संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. ४चौकशी पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर करण्यात आले असून उर्वरित ३२ विद्यार्थ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांचे निकालही लगेच जाहीर केले जातील, असे प्रभारी सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले.