शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम

By admin | Updated: August 8, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे

प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रमउस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. या अनुषंगानेच जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात निर्मल भारत अभियान कक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे राज्य सदस्य भारत पाटील, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी तांबे, रूपाली सातपुते, इसूफ कबीर, डॉ. शीतलकुमार मुकणे आदींची उपस्थिती होती.‘संडे सर्व्हीस’ उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत एकत्रित येऊन गावातील समस्यांसंदर्भात चर्चा करावयाची आहे. तसेच त्यावर उपाययोजनाही शोधायच्या आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून वैयक्तीक शौचालय बांधकाम, परिसर स्वच्छता, पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेसाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जी गावे एकजुटीने या उपक्रमात सहभागी होतील, त्या गावांच्या विकासाला गती मिळेल. अशा गावांत विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी गावानेच एकत्र येऊन विकास आराखडा तयार करण्याची गरज असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकांचे जसे अधिकार आहेत तसे कर्तव्येही आहेत. त्यामुळे अधिकार मागताना कर्तव्यही बजावले पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, सध्या जिल्ह्यात केवळ ३६ टक्के एवढी वैयक्तीक शौचालयांची संख्या आहेत. आपला जिल्हा निर्मल होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील काळात निवेदने घेऊन जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या विविध संघटना, मित्रमंडळे आणि नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत का, त्यांनी आपापल्या गावात वृक्षलागवड केली आहे काय, याचीही माहिती घेतली जाणार आहे. यासाठी खास मित्रमंडळ डायरी तयार करण्यात येऊन या गोष्टीचाही पाठपुरावा केला जाणार आहे.