शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम

By admin | Updated: August 8, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे

प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रमउस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. या अनुषंगानेच जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात निर्मल भारत अभियान कक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे राज्य सदस्य भारत पाटील, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी तांबे, रूपाली सातपुते, इसूफ कबीर, डॉ. शीतलकुमार मुकणे आदींची उपस्थिती होती.‘संडे सर्व्हीस’ उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत एकत्रित येऊन गावातील समस्यांसंदर्भात चर्चा करावयाची आहे. तसेच त्यावर उपाययोजनाही शोधायच्या आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून वैयक्तीक शौचालय बांधकाम, परिसर स्वच्छता, पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेसाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जी गावे एकजुटीने या उपक्रमात सहभागी होतील, त्या गावांच्या विकासाला गती मिळेल. अशा गावांत विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी गावानेच एकत्र येऊन विकास आराखडा तयार करण्याची गरज असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकांचे जसे अधिकार आहेत तसे कर्तव्येही आहेत. त्यामुळे अधिकार मागताना कर्तव्यही बजावले पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, सध्या जिल्ह्यात केवळ ३६ टक्के एवढी वैयक्तीक शौचालयांची संख्या आहेत. आपला जिल्हा निर्मल होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील काळात निवेदने घेऊन जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या विविध संघटना, मित्रमंडळे आणि नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत का, त्यांनी आपापल्या गावात वृक्षलागवड केली आहे काय, याचीही माहिती घेतली जाणार आहे. यासाठी खास मित्रमंडळ डायरी तयार करण्यात येऊन या गोष्टीचाही पाठपुरावा केला जाणार आहे.