शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

रविवारचा बाजार वाहतुकीच्या मुळावर

By admin | Updated: January 3, 2016 23:55 IST

जालना: शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गत काही वर्र्षांपासून रविवारचा भाजीपाला बाजार भरतो. मात्र, या बाजाराचे कोणतेच नियोजन नसल्याने

जालना: शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गत काही वर्र्षांपासून रविवारचा भाजीपाला बाजार भरतो. मात्र, या बाजाराचे कोणतेच नियोजन नसल्याने वाहतुकीबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रविवारीही शेकडो वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.आठवडी बाजाराच्या धरतीवर गत दोन वर्षांपासून हा बाजार भरत आहे. या बाजारात ताजा भाजीपाला मिळत असल्याने नागरिकांचाही या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु या बाजारामुळे वाहतुकीसह अनेक समस्या निर्माण होत आहे. यात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारामुळे हा रस्ता बंद असतो. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. यात रेल्वेस्थानकाला जोडणारा हा मार्ग असल्याने शेकडो दुचाकी, रिक्षा, कार तसेच इतर वाहनांची येथून वर्दळ असते. मात्र गत दोन वर्षांपासून ही समस्या सुटण्यासाठी कोणत्याही विभागाने पुढाकार घेतला नाही. नगर पालिकेकडूनही या बाजाराला अधिकृत परवानगी नसल्याचे सांगितले जाते. जामवाडी, वाघ्रूळ, नेर, इंदेवाडी, अंतरवाला, दावलवाडी, निधोना, माळशेंद्रा आदी गावातील शेकडो शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार भरल्यापासून वाहतुकीची गंभीर समस्या भेडसावते. बहुतांश बाजारकरू रस्त्याच्या कडेला बसत नाही. रस्त्याच्या अलिकडे आपली दुकाने थाटतात. यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकाने योग्य अंतरावर लावल्यास वाहतूक समस्या सुटू शकते. बाजार भर रस्त्यावर भरत असल्याने पालिकेकडूनही कोणती उपाययोजना केली जात नाही. नगर पालिकेने या बाजारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.