शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

विम्याची भरपाई हप्त्यापेक्षा कमीच

By admin | Updated: June 17, 2016 00:42 IST

औरंगाबाद : गतवर्षी खरिपात पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे.

औरंगाबाद : गतवर्षी खरिपात पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी विमा हप्त्यापोटी जेवढी रक्कम भरली, त्याहीपेक्षा कमी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने गुरुवारी कृषी सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही व्यथा मांडण्यात आली. औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी केवळ ०.९८ टक्के प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. कृष्णा पवार यांच्यासह येथील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतरही पिकांचा विमा भरला होता. पवार यांनी सांगितले की, सोयाबीन पिकासाठी आम्ही हेक्टरी ५७७ रुपये प्रमाणे प्रीमियम भरले होते. आता आम्हाला नुकसानभरपाई मंजूर झाली आहे; परंतु प्रत्यक्षात भरपाईची ही रक्कम हेक्टरी १०६ रुपये इतकीच आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम जमा झाली आहे. बँकेकडे विचारणा केली असता त्यांनी ०.९८ टक्के म्हणजे एक टक्कापेक्षाही कमी भरपाई मंजूर झाल्याची माहिती दिली.