शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

लग्न होईना म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 15, 2016 00:42 IST

औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा

औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा दुसरीकडे पुन्हा साखरपुडा केल्यामुळे लग्नाची आशा मावळलेल्या एका भावी नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. विष प्राशन केलेल्या तरुणावर घाटीत उपचार सुरू आहेत.मनीषसिंग यमुनासिंग राजपूत (२८, मूळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश, ह.मु. कोहिनूर पार्क, तीसगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुत्तेदारीची कामे करतो. याबाबत क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, मनीषसिंग याचा लासूर स्टेशन येथील विजयमाला (नाव बदललेले आहे) हिच्याशी १८ नोव्हेंबर २०१३ रोजी साखरपुडा झाला होता. दरम्यान, साखरपुड्यात दागिने करण्यासाठी आणि नंतर थोडे-थोडे करून विजयमालाच्या घरच्यांनी मनीषसिंग याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपये घेतले. आता मात्र २ मार्च २०१६ रोजी विजयमालाच्या नातेवाईकांनी तिचा साखरपुडा दुसऱ्या तरुणाशी करून दिला. त्यामुळे पैसेही गेले आणि लग्नही होत नाही, असे समजून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ३ मार्च रोजी मनीषसिंग याने स्पीड पोस्टाने शिल्लेगाव पोलिसांत तक्रार केली.या तक्रारीनंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आणि त्यालाही चौकशीला न बोलावल्यामुळे रागाच्या भरात त्याने सोमवारी सकाळी विष प्राशन केले. तक्रार अर्जासह तो थेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात आला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असतानाच त्याला चक्कर आली. तो जमिनीवर पडल्यावर त्याने विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला रिक्षातून तात्काळ घाटीत दाखल केले. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनीषसिंग याने केलेली तक्रार १० मार्च रोजी प्राप्त झाली आहे. सोमवारी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा जबाब घेण्यात आला असून, मनीषसिंग याचा साखरपुडा झालेला नाही. ४संबंधित मुलीचे लग्न तुझ्याशीच लावून देऊ, असे सांगून मुलीच्या एका नातेवाईकाने त्याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, त्या नातेवाईक महिलेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर इतरांना मनीषसिंग याने लग्नाबाबत विचारले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मनीषने हे कृत्य केल्याचे शिल्लेगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.