शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उसाच्या चाऱ्याने आरोग्यास धोका

By admin | Updated: March 31, 2016 00:35 IST

बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.

बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. फॉस्फरस, कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असून, शुगर वाढत आहे. परिणामी जनावरे भाकड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात २५६ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास अडीच लाख जनावरांची देखभाल केली जात आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये छावण्या सुरू झाल्याने उसाच्या वाढ्याशिवाय पर्याय नव्हता. फेब्रुवारी महिन्यात रबीची काढणी होऊन सुमारे ३ लाख ८३ हजार मे. टन एवढा चारा उपलब्ध झाला होता. त्यानुसार छावणीतील जनावरांना कडब्याचा चारा पुरविणे अपेक्षित होते.वाढते दर असल्याने छावणी चालकही कडबा खरेदीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कडबा उपलब्ध असूनही तो इतर जिल्ह्यात विकला जात आहे. उस वाढ्याचा उपयोग पूरक आहार म्हणून करणे सोयीचे आहे; परंतु सातत्याने उसाचे वाढेच पुरविले गेल्याने फॉस्फरस, कॅल्शियमचे कमी होत असून, शुगर वाढत असल्याचे भाकीत परभणी येथील प्रयोगशाळेने व्यक्त केले आहे.छावण्यांमध्ये उसाचे वाढ अन् बाजरीच्या सरमाडचा चारा म्हणून अधिक वापर होत आहे. त्यामुळे जनावरांची लागण क्षमताही कमी होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.