शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उसाची काश्मीरपर्यंत गोडी

By | Updated: December 4, 2020 04:11 IST

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- ...

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- काश्मीरपर्यंतच्या लोकांना गोडी लागली आहे. हंगामात दररोज १०० टनांपेक्षा अधिक ऊस राज्यासह परराज्यात पाठविला जातो.

साखर कारखान्यापेक्षा टनामागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आता रसवंतीलाच ऊस देत आहेत. फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांतील हजारावर शेतकरी या ऊस लागवडीकडे वळले आहेत. याचे श्रेय जाते ममुराबादचे (ता.खुलताबाद) रहिवासी राउफ पटेल यांना. पटेल हे व्यापारी. येथील उसाला जम्मू-काश्मीरपर्यंतची हक्काची बाजारपेठ मिळून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी सांगितले ८-१० वर्षांपूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. तेव्हा एका रसवंतीचालकाने विश्वास दाखवत ऊस पुरवठ्याचे काम दिले. गावातील शेतकऱ्यांकडून २० टन ऊस घेऊन तो रसवंतीगृहाला विकला. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. हंगामात दररोज १०० ते १२५ टन ऊस राज्य-परराज्यातील ५०० पेक्षा अधिक रसवंत्यांना आता मी पाठवितो. शेतकऱ्यांना ऊस शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना बेनं उपलब्ध करून देणे, ऊस आल्यावर त्याची तोडणी करणे व शेतकऱ्याला शेतातच पैसे उपलब्ध करून देऊ लागलो. उसाच्या भावानुसार शेतकऱ्यांना दीड ते अडीच लाखांदरम्यान एकरी उत्पन्न मिळत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जानेवारी ते जूनदरम्यान महाराष्ट्र, इंदूर, भोपाळ, रायपूर येथील रसवंतीला ऊस पुरवठा केला जातो. जुलै व ऑगस्टदरम्यान राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब व जम्मू-काश्मीर येथील रसवंतीसाठी ऊस पुरवला जातो. येथील ऊस कमी पडला तर नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील ऊसही काश्मीरपर्यंत पाठविला जातो. पटेल यांच्याकडे काम केलेल्या चौघांनी आता स्वतःचा ऊस पुरवठ्याचा होलसेल व्यापार सुरू केला आहे.

चौकट

अनेकांना मिळाला रोजगार

फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर येथील हजार शेतकरी व ऊस तोडणी करणारे ५०० मजूर, हंगामात २० पेक्षा अधिक मालट्रक व १०० पेक्षा अधिक टेम्पोचालक यांना रोजगार मिळाला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत ऊस तोडणी, वाहतूक व्यापाऱ्यांत १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. साखर कारखान्यापेक्षा टनामागे ४०० ते ५०० रुपये अधिक भाव मिळत असल्याने सुमारे १ हजार शेतकरी उसाकडे वळले आहेत.