शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

जिल्ह्यातील उसाची काश्मीरपर्यंत गोडी

By | Updated: December 4, 2020 04:11 IST

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- ...

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- काश्मीरपर्यंतच्या लोकांना गोडी लागली आहे. हंगामात दररोज १०० टनांपेक्षा अधिक ऊस राज्यासह परराज्यात पाठविला जातो.

साखर कारखान्यापेक्षा टनामागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आता रसवंतीलाच ऊस देत आहेत. फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांतील हजारावर शेतकरी या ऊस लागवडीकडे वळले आहेत. याचे श्रेय जाते ममुराबादचे (ता.खुलताबाद) रहिवासी राउफ पटेल यांना. पटेल हे व्यापारी. येथील उसाला जम्मू-काश्मीरपर्यंतची हक्काची बाजारपेठ मिळून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी सांगितले ८-१० वर्षांपूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. तेव्हा एका रसवंतीचालकाने विश्वास दाखवत ऊस पुरवठ्याचे काम दिले. गावातील शेतकऱ्यांकडून २० टन ऊस घेऊन तो रसवंतीगृहाला विकला. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. हंगामात दररोज १०० ते १२५ टन ऊस राज्य-परराज्यातील ५०० पेक्षा अधिक रसवंत्यांना आता मी पाठवितो. शेतकऱ्यांना ऊस शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना बेनं उपलब्ध करून देणे, ऊस आल्यावर त्याची तोडणी करणे व शेतकऱ्याला शेतातच पैसे उपलब्ध करून देऊ लागलो. उसाच्या भावानुसार शेतकऱ्यांना दीड ते अडीच लाखांदरम्यान एकरी उत्पन्न मिळत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जानेवारी ते जूनदरम्यान महाराष्ट्र, इंदूर, भोपाळ, रायपूर येथील रसवंतीला ऊस पुरवठा केला जातो. जुलै व ऑगस्टदरम्यान राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब व जम्मू-काश्मीर येथील रसवंतीसाठी ऊस पुरवला जातो. येथील ऊस कमी पडला तर नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील ऊसही काश्मीरपर्यंत पाठविला जातो. पटेल यांच्याकडे काम केलेल्या चौघांनी आता स्वतःचा ऊस पुरवठ्याचा होलसेल व्यापार सुरू केला आहे.

चौकट

अनेकांना मिळाला रोजगार

फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर येथील हजार शेतकरी व ऊस तोडणी करणारे ५०० मजूर, हंगामात २० पेक्षा अधिक मालट्रक व १०० पेक्षा अधिक टेम्पोचालक यांना रोजगार मिळाला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत ऊस तोडणी, वाहतूक व्यापाऱ्यांत १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. साखर कारखान्यापेक्षा टनामागे ४०० ते ५०० रुपये अधिक भाव मिळत असल्याने सुमारे १ हजार शेतकरी उसाकडे वळले आहेत.