शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

‘पॅशन’शिवाय यश अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याविषयी ‘पॅशन’असणे आवश्यक आहे. नाट्य असो की चित्रपट.. साहित्य असो की संगीत... सगळीकडेच अगदी हृदयातून असणारी आवडच कामी येते. अन्यथा यश मिळविणे कठीण असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. मंचावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान, आयोजन समिती सदस्य डॉ. दासू वैद्य, डॉ. संजय मोहड, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय देवळाणकर, डॉ. संजय नवले आणि लक्ष्मीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी प्रतीक्षा लोणकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत असताना या जागेचे महत्त्व समजले नाही. मात्र या शहरातून मुंबईत स्थलांतर केल्यानंतर या विभागाचे, शहराचे महत्त्व कळल्याचे लोणकर यांनी सांगितले. आता याठिकाणी आल्यामुळे सर्व घटनांचा फ्लॅशबॅक समोर आला. तो आयुष्याचा फ्लॅशकटच आहे. औरंगाबादेतच नाटकांची समान आवड असणारी माणसे एकत्र आली. त्यातून नावीन्यपूर्ण भूमिका केल्या. तेव्हा यश मिळाले. आता यश मिळविण्याच्या तंत्रांची मोठ्या प्रमाणात पुस्तकेही बाजारात आली आहेत. मात्र या पुस्तकांचा वापर करून मिळणा-या यशाचा दर्जा ओळखला पाहिजे, असा सल्लाही लोणकर यांनी दिला.शिक्षण घेतलेल्या ठिकाणीच युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावणे हा खरा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील युवकांना युवक महोत्सव हे महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होते. याठिकाणी सर्वांनी कला सादर करावी. बक्षिसे कोणालाही मिळतील. मात्र सर्वच विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेण्याचे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. मुस्तजिब खान यांनी आयोजनाची माहिती दिली. यावेळी नुकतेच निधन पावलेले डॉ.रुस्तुम अचलखांब, डॉ. किशन ढाबे, जमील आणि स्वातंत्र्यसैनिक लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे यांनी आभार मानले.