शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मजुरीवर उदरनिर्वाह; कर्जाचा बोजा कायम, सांगा कसे जगायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज १९ मार्च रोजी ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. कौतुकाने काही सांगावे, ...

विकास राऊत

औरंगाबाद : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज १९ मार्च रोजी ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. कौतुकाने काही सांगावे, असा हा दिवस नाही. मात्र, या ३५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नशिबी हालअपेष्टांचे जगणे कायम आहे. मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वर्षागणिक वाढतच चालले असून घरातील कर्त्या धन्याने नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मजुरी, कर्जाचा ओझे घेऊन संघर्ष यातनांसह जगावे लागते आहे. सरकारच्या अनेक योजना, उपक्रम गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांने आत्महत्या करून जीवन संपविले नाही, असे ३५ वर्षांत एकही वर्ष नाही.

२००६ च्या निर्णयानुसार देण्यात येणारी १ लाखांची मदतदेखील सरकारी कारभार, चौकशा, वशिलेबाजीत अडकून पडते. १५ वर्षांत महागाईचा दर आभाळाला भिडला आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवाचे मोल १ लाखांत करून तेही वेळेत न देण्याचा तुघलकी कारभार राज्यात सुरू आहे. आत्महत्या केल्यानंतरही कर्जाचा बोजा तसाच राहतो व कुटुंबीयांना कर्जाची परतफेड करावी लागते.

गेले दोन पावसाळे जिल्ह्यात चांगले बरसले, मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. अवकाळी पावसाने गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामात व यंदा गेल्या महिन्यात रबी हंगामातील पिकांचे नुकसान केले. या सगळ्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी नैसर्गिक, आर्थिक, मानसिक खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर बेततो आहे.

२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या

मराठवाड्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अंदाजे ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ११० आत्महत्यांची नोंद झाली. त्यातील ७० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. उर्वरित प्रकरणे चौकशीअंती निकाली काढल्याचा दावा करण्यात येत आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी मागील वर्षी २० प्रकरणांमध्ये चौकशी झाली.

२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या अशा

जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात सुमारे १२२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यातील ९६ प्रकरणांत शासकीय मदत देण्यात आली. ७० हजार बँकेत डिपॉझिट, तर आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना ३० हजारांची रोख मदत देण्यात आली. २६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. त्यातील १७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

२०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २६ आत्महत्या

२०२१ वर्षाच्या सुरुवातीला दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात २६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यातील निम्या प्रकरणात शासकीय मदत दिली आहे. काही प्रकरणांची अजून चौकशी झालेली नाही.

-----------------------------------------------------------

मजुरी करून उदरनिर्वाह

शेलूद येथील शेतकरी रामदास नरवडे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वतीबाई नरवडे व दोन मुले आहेत. सध्या पत्नी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा मुलगा बारावीत शिकत आहे. शासकीय मदत अद्याप मिळालेलीच नाही, शिवाय नरवडे यांचे दीड लाखांचे कर्जदेखील तसेच आहे. त्यांचा एक मुलगा मतिमंद आहे.

-----------------------------------------------------------

संघर्षासह जगण्याची वेळ

तालुक्यातील लाडसावंगी परिसरातील दीपक गवळी या शेतकऱ्याने गेल्या महिन्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी ज्योती गवळी व दोन मुलांवर संघर्षासह जगण्याची वेळ आली आहे. गवळी कुटुंबीयांना आजवर शासकीय मदत मिळालेली नाही. शेतात मजुरी करून ज्योती घर चालवत आहेत. दीपक यांनी सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते.

-----------------------------------------------------------

मजुरी करण्याविना पर्याय नाही

फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील शेतकरी अशोक कडूबा काळे यांनी कर्जबाजारीपणामुळे तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी लक्ष्मी काळे व दोन मुले असून त्यांच्यासमोर मजुरी करून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नाही. एक एकर शेती असून त्यात काही भागत नाही. शासकीय मदतही आजवर मिळालेली नाही.